शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

अवैध वाळू उपश्यामुळे सुरगावकरांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळूचोरट्यांच्या उपद्रवामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ मोठे खड्डे पडल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांआड होतो पाणीपुरवठा : विहिरीजवळ पडलेत मोठे खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदी असो की मुक्ती, याचा वाळू चोरट्यांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. सेलू तालुक्यातील सूरगाव येथील सूर नदी व धामनदीमध्ये वारेमाप दिवसरात्र वाळूउपसा सुरू आहे. सुरगावला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील वाळू काढून नेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी पाणी खोल गेल्याने दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. या अवैध उपस्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीलाही धोका असल्याने वेळीच आळा घालण्याची मागणी होत आहे.सुरगाव येथील नदीपात्रामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा सुरु आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही कठोर कारवाई न करता केवळ देखावा केला जात आहे. त्यामुळे गावामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील काही व्यक्तींसह सेलू, येळाकेळी, महाकाळ तसेच वर्ध्यातील नालवाडी, साटोडा, आलोडी आदी भागातील अनेक वाळूचोर सकाळपासूनच नदीपात्रात धुडगूस घालताना दिसतात.दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळूचोरट्यांच्या उपद्रवामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ मोठे खड्डे पडल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.वाळू चोरट्यांमुळे नदीपात्राची चाळण झाली असून शासनाचाही मोठा महसूल बुडत आहे. सोबतच गावालाही भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.शहरात मातीमिश्रित वाळूचा पुरवठासुरगाव हे सेलू तालुक्यात तर महाकाळ हे वर्धा तालुक्यात येत असून या दोन्ही तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाºयांंचे या ठिकाणावरील वाळू उपश्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणावरून येणारी मातीमिश्रित वाळू वर्धा शहरासह सेलूतील विविध शासकीय व खासगी बांधकामांकरिता वापरली जात आहे. नदीतून वाळू भरलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक थेट शहरात प्रवेश करीत असतानाही कारवाई होत नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे. त्यामुळे आता तरी त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.सातीत ट्रॅक्टर केला जप्तहिंगणघाट तालुक्यातील साती (वरुड) या परिसरात मोठ्या प्र्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळताच हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा, नायब तहसीलदार विजय पवार व तलाठी सतीश झोरे यांनी गुरुवारी मध्यरात्री साती गाव गाठून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. तो ट्रॅक्टर वरुड येथील बंडू उमाटे यांच्या मालकीचा असून त्याच्याविरुद्ध अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार मुंदडा यांनी दिली.

टॅग्स :sandवाळूwater shortageपाणीकपात