कान्हापूर-मोर्चापूर रस्त्याची दैना
By Admin | Updated: May 18, 2015 02:04 IST2015-05-18T02:04:14+5:302015-05-18T02:04:14+5:30
सेलू मार्गावर कान्हापूर येथून मोर्चापूरकडे जात असलेल्या रस्त्याची मोठी दैना झाली आहे.

कान्हापूर-मोर्चापूर रस्त्याची दैना
वर्धा : सेलू मार्गावर कान्हापूर येथून मोर्चापूरकडे जात असलेल्या रस्त्याची मोठी दैना झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडून गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
शहराला सर्व गावे जोडली जावी यासाठी मुख्य रस्त्यापासून आत असलेल्या गावांपर्यंत पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्याशिवाय गावांपर्यत विकास पोहोचू शकत नाही. म्हणूनच या रस्त्यांना रक्तवाहिन्या संबोधले जाते. वर्धा-सेलू मार्गावर असलेल्या कान्हापूर या गावापासून आत असलेल्या मोर्चापूर, वाहितपूर, रमणा यासह अनेक गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी पक्क्या डांबर रस्त्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना सेलू, वर्धा आदी शहरांकडे येणे सोपे झाले. हा संपूर्ण परिसर सुपीक जमिनींनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्गाला झालेले उत्पन्न विकण्यासाठी त्यांना सेलू किंवा वर्धा शहरच गाठावे लागते. या रस्त्याने बैलगाडीची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याच्या निर्मितीपासून या मार्गाकडे दुर्लक्ष केल्याने सध्यस्थितीत कान्हापूर ते मोर्चापूर रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडले असून रस्त्याची पूर्णत: दैना झाली आहे. हा रस्त्या वळणावळणाचा आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून किरकोळ अपघात तर येथे नित्याचेच झाले आहे. या मार्गावर डांबराचा कोट चढविणे गरजेचे झाले आहे. काहीच दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. त्याआधी या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रस्त्यावर आणखी खड्डे निर्माण होऊन अपघात बळावू शकतात. त्यामुळे ता रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक व प्रवासी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)