शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:03 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप्ट बदलली आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : रा.स्व.संघाने आर्थिक आरक्षणाची व्याख्या मांडावी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप्ट बदलली आहे. आर्थिक आरक्षणाबाबत रा.स्व.संघाचे पुढारी बोलत असले तरी त्यांनी सर्वप्रथम त्याची व्याख्या मांडावी, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन होत असले तरी विदर्भात अमरावतीनंतर मराठा समाज कुठेही मोठ्या प्रमाणात नाहीत. विदर्भात कुणबी समाज बांधव आहेत. त्यांना हा लढा आपला वाटत नसल्याने ते यात सहभागी झालेले नाही असा दावा अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला आहे. आरक्षणाची मागणी रेटताना मराठा समाज बांधव आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत. ही बाब गंभीर आहे. जगणे हे महत्त्वाचे मानल्या जात असून आत्महत्यांनी हा प्रश्न सुटणार नाहीच. शिवाय या आंदोलनकर्त्यांना त्यांचे पुढारीही आत्महत्या थांबवा असे सांगण्याच्या स्थितीत नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.सध्या संविधान पुढे चालेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१९ ची निवडणूक संविधान कायम ठेवणारे व ते बदलविण्याचा प्रयत्न करणारे अशीच रंगणार आहे. या निवडणुकीत आम्ही आमचा वापर होऊ देणार नाही. ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समुहातील सामाजिक व राजकीय प्रतिनिधींसोबतच्या संवाद बैठकांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधत आहे. या सरकारची खरी टेस्टींग २०१९ च्या निवडणुकीत होणार आहे.महानगर पालिकांची निवडणूक पैशांच्या जोरावरच होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. पत्रकार परिषदेला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, विजय मोरे, राजू गोरडे आदींची उपस्थिती होती.वंचितांशी साधला संवादभारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर वंचितांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत रविवारी वर्धा येथे प्रदीप मंगल कार्यालयात त्यांनी वंचितांशी संवाद साधला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावरही त्यांनी पत्रकार परिषदेत टिका केली. तसेच या कार्यक्रमाला धनगर समाजाचे नेतेही उपस्थित होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्र्श्वभुमीवर भारीप बहुजन महासंघाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण