शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

आत्महत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:03 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप्ट बदलली आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : रा.स्व.संघाने आर्थिक आरक्षणाची व्याख्या मांडावी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप्ट बदलली आहे. आर्थिक आरक्षणाबाबत रा.स्व.संघाचे पुढारी बोलत असले तरी त्यांनी सर्वप्रथम त्याची व्याख्या मांडावी, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन होत असले तरी विदर्भात अमरावतीनंतर मराठा समाज कुठेही मोठ्या प्रमाणात नाहीत. विदर्भात कुणबी समाज बांधव आहेत. त्यांना हा लढा आपला वाटत नसल्याने ते यात सहभागी झालेले नाही असा दावा अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला आहे. आरक्षणाची मागणी रेटताना मराठा समाज बांधव आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत. ही बाब गंभीर आहे. जगणे हे महत्त्वाचे मानल्या जात असून आत्महत्यांनी हा प्रश्न सुटणार नाहीच. शिवाय या आंदोलनकर्त्यांना त्यांचे पुढारीही आत्महत्या थांबवा असे सांगण्याच्या स्थितीत नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.सध्या संविधान पुढे चालेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१९ ची निवडणूक संविधान कायम ठेवणारे व ते बदलविण्याचा प्रयत्न करणारे अशीच रंगणार आहे. या निवडणुकीत आम्ही आमचा वापर होऊ देणार नाही. ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समुहातील सामाजिक व राजकीय प्रतिनिधींसोबतच्या संवाद बैठकांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधत आहे. या सरकारची खरी टेस्टींग २०१९ च्या निवडणुकीत होणार आहे.महानगर पालिकांची निवडणूक पैशांच्या जोरावरच होत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. पत्रकार परिषदेला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, विजय मोरे, राजू गोरडे आदींची उपस्थिती होती.वंचितांशी साधला संवादभारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर वंचितांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत रविवारी वर्धा येथे प्रदीप मंगल कार्यालयात त्यांनी वंचितांशी संवाद साधला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावरही त्यांनी पत्रकार परिषदेत टिका केली. तसेच या कार्यक्रमाला धनगर समाजाचे नेतेही उपस्थित होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्र्श्वभुमीवर भारीप बहुजन महासंघाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaratha Reservationमराठा आरक्षण