शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सततच्या नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 14:05 IST

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या संकटात आणखीच भर घातली.

साहूर (वर्धा) : सततची नापिकी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्याने घरालगतच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना साहूर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मधुकर टिकाराम गणेसर (८५, रा. साहूर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असून पत्नी, दोन मुले, स्नुषा व नातवंड असा परिवार आहे. मधुकर यांचे आयुष्यच संघर्षमय राहिलं आहे. अल्प शेतीमध्ये कष्ट करून ते संसाराचा गाडा हाकत होते. पण, सातत्याने नापिकीचा सामना त्यांना करावा लागला. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या संकटात आणखीच भर घातली. त्यामुळे कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत असलेल्या मधुकर यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.

गुरुवारी रात्रीला घरातील मंडळी झोपलेली असताना मधुकर यांनी घरालगतच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. मधुकर हे घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांची काठी व चप्पल विहिरीजवळ आढळून आली. गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेऊन गर्दी केली. आष्टी पोलिसांना याची माहिती मिळताच ठाणेदार लक्ष्मण लोकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नबी शेख, बीट जमादार गजानन वडनेरकर, परकोट यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता आर्वीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार लोकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीwardha-acवर्धा