शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

नव्या जलवाहिनीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:44 IST

देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्री : जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यत पोहोचवाव्यात, २०२० पर्यंत या शहरातील प्रत्येक गरिबाचे स्वत:चे पक्के घर असायला पाहिजे. शासनाने जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून शेवटच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत देवळी शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी टाकावयाच्या नवीन जलवाहिनीचे प्रस्ताव येत्या सात दिवसांत नगर परिषदेने शासनाकडे सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिलेत.देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभरणी करण्यात आली. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगर परिषद अध्यक्ष सुचिता मडावी, राजेश बकाने, गटनेत्या शोभा तडस, मिलिंद भेंडे, जिल्हा परिषद सभापती मुकेश भिसे, डॉ. शिरीष गोडे, नगर परिषद सदस्य मारोती मरगडे, गजानन टिपरे, मिलिंद ठाकरे, नंदू वैद्य, संगीता तराळे, कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, विजय गोमासे, मुख्याधिकारी अंकुश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी शेतकºयांना बियाणे, खतासाठी ६ हजार रुपये दिले. आता शेतकºयांसाठी पेन्शन योजनाही आणली असून या योजनेत प्रत्येक शेतकरी कुटुंबाने सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आशा सेविका ज्योत्स्ना प्रवीण राऊत यांनी आपल्या समस्यांबाबत विचार व्यक्त केले असता आशा वर्कर्सबाबत शासन लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृद्ध कलावंताचा आधार काठी देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकर सोडविण्याच्या सूचना केल्यात. यावेळी खासदार रामदास तडस यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर तर संचालन पंकज चोरे यांनी केले. कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे