शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नव्या जलवाहिनीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:44 IST

देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्री : जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यत पोहोचवाव्यात, २०२० पर्यंत या शहरातील प्रत्येक गरिबाचे स्वत:चे पक्के घर असायला पाहिजे. शासनाने जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून शेवटच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत देवळी शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी टाकावयाच्या नवीन जलवाहिनीचे प्रस्ताव येत्या सात दिवसांत नगर परिषदेने शासनाकडे सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिलेत.देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभरणी करण्यात आली. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगर परिषद अध्यक्ष सुचिता मडावी, राजेश बकाने, गटनेत्या शोभा तडस, मिलिंद भेंडे, जिल्हा परिषद सभापती मुकेश भिसे, डॉ. शिरीष गोडे, नगर परिषद सदस्य मारोती मरगडे, गजानन टिपरे, मिलिंद ठाकरे, नंदू वैद्य, संगीता तराळे, कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, विजय गोमासे, मुख्याधिकारी अंकुश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी शेतकºयांना बियाणे, खतासाठी ६ हजार रुपये दिले. आता शेतकºयांसाठी पेन्शन योजनाही आणली असून या योजनेत प्रत्येक शेतकरी कुटुंबाने सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आशा सेविका ज्योत्स्ना प्रवीण राऊत यांनी आपल्या समस्यांबाबत विचार व्यक्त केले असता आशा वर्कर्सबाबत शासन लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृद्ध कलावंताचा आधार काठी देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकर सोडविण्याच्या सूचना केल्यात. यावेळी खासदार रामदास तडस यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर तर संचालन पंकज चोरे यांनी केले. कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे