शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

विद्यार्थ्यांनी रोखली तासभर जलद बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 21:54 IST

मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची ताटकळ : चार दिवसांपासून बस होताहेत नादुरूस्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. बसच्या प्रतीक्षेत भुकेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती-हिंगणघाट ही जलद बस तासभर रोखून धरली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर पर्यायी व्यवस्था केल्यानंतर विद्यार्थी शांत झाले.पण, तोपर्यंत परिवहन महामंडळाच्या दैनावस्थेचे वाभाडे निघाले.देवळी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने परिसरातील विद्यार्थी दररोज देवळीत शिक्षणाकरिता येतात. सकाळी शाळा सुटल्यानंतर देवळी स्थानकावरुन दुपारी १२ वाजतादरम्यान गौळ, कोळोणा व टाकळी (खोडे ) या गावातील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था आहे. परंतु ही बस मागील चार दिवसांपासून देवळी बसस्थानकावर आल्यानंतर पंक्चर होते. त्यामुळे सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजतापर्यंत उपाश्यापोटी ताटकाळत रहावे लागते. बुधवारी बस पंक्चर झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानकावरील विद्यार्थ्यांनी बसचालकाला मदत केली. गाडीचे चाक काढण्यापासून पंक्चर दुरुस्त्त करेपर्यंत सहकार्य केले. तेव्हा कुठे ती बस दोनवाजेपर्यंत दुरूस्त झाल्याने तीन-साडेतीन वाजता गावात पोहचली. पुन्हा गुरुवारलाही तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांचा संयम ढळला. त्यांनी जलद बस अडवून धरत परिवहन महामंडळाच्या निद्रिस्त प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गावचा रस्ता धरला.नवीन टायर नसल्याने पंक्चरचे प्रमाण वाढलेपुलगाव डेपोला नवीन टायरचा पुरवठा केला नसल्याने पुर्णत: घासलेले जुने टायर वापरले जात आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसगाड्यांसाठी वापरले जाणारे टायर टाकावू स्वरूपाचे असल्याने वेळोवेळी पंक्चर होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. चालक व वाहकांनाही प्रवाशांच्या रोषाला समोरे जावे लागते.जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करादेवळी बसस्थानकावर परिवहन महामंडळाचा जबाबदार व्यक्ती नसल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. याठिकाणी कार्यरत महिला कर्मचारी विद्यार्थ्यांना सवलतीची पास देताना वेठीस धरतात. तसेच प्रवाशी व विद्यार्थ्यांना उद्धट वागणूक देतात. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर जबाबदार व समजदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळ