शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी रोखली तासभर जलद बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 21:54 IST

मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची ताटकळ : चार दिवसांपासून बस होताहेत नादुरूस्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. बसच्या प्रतीक्षेत भुकेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती-हिंगणघाट ही जलद बस तासभर रोखून धरली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर पर्यायी व्यवस्था केल्यानंतर विद्यार्थी शांत झाले.पण, तोपर्यंत परिवहन महामंडळाच्या दैनावस्थेचे वाभाडे निघाले.देवळी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने परिसरातील विद्यार्थी दररोज देवळीत शिक्षणाकरिता येतात. सकाळी शाळा सुटल्यानंतर देवळी स्थानकावरुन दुपारी १२ वाजतादरम्यान गौळ, कोळोणा व टाकळी (खोडे ) या गावातील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था आहे. परंतु ही बस मागील चार दिवसांपासून देवळी बसस्थानकावर आल्यानंतर पंक्चर होते. त्यामुळे सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजतापर्यंत उपाश्यापोटी ताटकाळत रहावे लागते. बुधवारी बस पंक्चर झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानकावरील विद्यार्थ्यांनी बसचालकाला मदत केली. गाडीचे चाक काढण्यापासून पंक्चर दुरुस्त्त करेपर्यंत सहकार्य केले. तेव्हा कुठे ती बस दोनवाजेपर्यंत दुरूस्त झाल्याने तीन-साडेतीन वाजता गावात पोहचली. पुन्हा गुरुवारलाही तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांचा संयम ढळला. त्यांनी जलद बस अडवून धरत परिवहन महामंडळाच्या निद्रिस्त प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गावचा रस्ता धरला.नवीन टायर नसल्याने पंक्चरचे प्रमाण वाढलेपुलगाव डेपोला नवीन टायरचा पुरवठा केला नसल्याने पुर्णत: घासलेले जुने टायर वापरले जात आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसगाड्यांसाठी वापरले जाणारे टायर टाकावू स्वरूपाचे असल्याने वेळोवेळी पंक्चर होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. चालक व वाहकांनाही प्रवाशांच्या रोषाला समोरे जावे लागते.जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करादेवळी बसस्थानकावर परिवहन महामंडळाचा जबाबदार व्यक्ती नसल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. याठिकाणी कार्यरत महिला कर्मचारी विद्यार्थ्यांना सवलतीची पास देताना वेठीस धरतात. तसेच प्रवाशी व विद्यार्थ्यांना उद्धट वागणूक देतात. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर जबाबदार व समजदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळ