शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा; प्राचार्या भारावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:24 IST

स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकेसरीमल कन्या शाळेतील घटना : दोन विद्यार्थिनींना दिली स्कूल बॅग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.कार्याजंली उत्सवात केसरीमल कन्या शाळेचे शिक्षक हिरहिरीने भाग घेत आहेत. सुजाता जोशी यांना पिसथनमध्ये भाग घ्यायचा होता. आॅनलाईन रजिस्ट्रेशन करताना अडचण सोडविण्यासाठी जोशी या मुख्याध्यापिकेकडे आल्या. तेवढ्यात दहा-बारा वर्षाची ५ वीत शिकणारी मुलगी प्राचार्यांना आत येवू का, असे विचारत होती. तिच्या हातात ५०० रूपयाची नोट होती. त्यापूर्वी प्राचार्यांनी घरातील ठेवून असलेल्या तीन स्कूल बॅग शाळेतील काही गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले होते. त्यानुसार १८ सप्टेंबरला तीन पैकी दोन स्कूल बॅग शाळेच्या दोन विद्यार्थिनींना वितरीत करण्यात आल्या होत्या व एक बॅग शाळेत ठेवण्यात आली होती. पाचवीच्या वर्गशिक्षीकेला बोलावून वर्गात दप्तर नसलेल्या दोन मुलींची निवड करून त्यांना दप्तर द्या, असे प्राचार्यांनी सांगितले होते.या दोनही मुलींनी दप्तर दिल्यानंतर त्यापैकी वैष्णवी मारोतराव मोहुर्ले या मुलीला मिळालेल्या दप्तराच्या बॅगमध्ये ५०० रूपयाची नोट सापडली होती. ती नोट परत आणून देण्यासाठी ती प्राचार्यांना आता येवू का म्हणून परवानगी मागत होती. तिचा हा प्रामाणीकपणा पाहून प्राचार्या काही वेळ भारावूनच गेल्या.या घटनेने आजही प्रामाणीकता जीवंत असल्याचा परिचय प्राचार्या कोटगीरवार यांना आला. तिला बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे हे शक्य होवू शकले, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.तिसरी बॅगही वैष्णवीला दिली भेटवैष्णवीचा प्रामाणिकपणा पाहून भारावलेल्या प्राचार्य जयश्री कोटगीरवार यांनी त्या विद्यार्थीनीला त्यांच्याजवळ शिल्लक असलेली तिसरी बॅग भेट म्हणून दिली तिचे विद्यार्थ्यासमोर कौतुकही केले.या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यानी नवा आदर्श निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शाळेच्यावतीने वेळोवेळी विद्यार्थीनी करीता व्यक्तीमत्व विकासाचे शिबीर घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात यामुळे अशा घटना सुखद आनंद देवून जातात, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी