शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा; प्राचार्या भारावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:24 IST

स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकेसरीमल कन्या शाळेतील घटना : दोन विद्यार्थिनींना दिली स्कूल बॅग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.कार्याजंली उत्सवात केसरीमल कन्या शाळेचे शिक्षक हिरहिरीने भाग घेत आहेत. सुजाता जोशी यांना पिसथनमध्ये भाग घ्यायचा होता. आॅनलाईन रजिस्ट्रेशन करताना अडचण सोडविण्यासाठी जोशी या मुख्याध्यापिकेकडे आल्या. तेवढ्यात दहा-बारा वर्षाची ५ वीत शिकणारी मुलगी प्राचार्यांना आत येवू का, असे विचारत होती. तिच्या हातात ५०० रूपयाची नोट होती. त्यापूर्वी प्राचार्यांनी घरातील ठेवून असलेल्या तीन स्कूल बॅग शाळेतील काही गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले होते. त्यानुसार १८ सप्टेंबरला तीन पैकी दोन स्कूल बॅग शाळेच्या दोन विद्यार्थिनींना वितरीत करण्यात आल्या होत्या व एक बॅग शाळेत ठेवण्यात आली होती. पाचवीच्या वर्गशिक्षीकेला बोलावून वर्गात दप्तर नसलेल्या दोन मुलींची निवड करून त्यांना दप्तर द्या, असे प्राचार्यांनी सांगितले होते.या दोनही मुलींनी दप्तर दिल्यानंतर त्यापैकी वैष्णवी मारोतराव मोहुर्ले या मुलीला मिळालेल्या दप्तराच्या बॅगमध्ये ५०० रूपयाची नोट सापडली होती. ती नोट परत आणून देण्यासाठी ती प्राचार्यांना आता येवू का म्हणून परवानगी मागत होती. तिचा हा प्रामाणीकपणा पाहून प्राचार्या काही वेळ भारावूनच गेल्या.या घटनेने आजही प्रामाणीकता जीवंत असल्याचा परिचय प्राचार्या कोटगीरवार यांना आला. तिला बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे हे शक्य होवू शकले, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.तिसरी बॅगही वैष्णवीला दिली भेटवैष्णवीचा प्रामाणिकपणा पाहून भारावलेल्या प्राचार्य जयश्री कोटगीरवार यांनी त्या विद्यार्थीनीला त्यांच्याजवळ शिल्लक असलेली तिसरी बॅग भेट म्हणून दिली तिचे विद्यार्थ्यासमोर कौतुकही केले.या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यानी नवा आदर्श निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शाळेच्यावतीने वेळोवेळी विद्यार्थीनी करीता व्यक्तीमत्व विकासाचे शिबीर घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात यामुळे अशा घटना सुखद आनंद देवून जातात, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी