शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा; प्राचार्या भारावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:24 IST

स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकेसरीमल कन्या शाळेतील घटना : दोन विद्यार्थिनींना दिली स्कूल बॅग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.कार्याजंली उत्सवात केसरीमल कन्या शाळेचे शिक्षक हिरहिरीने भाग घेत आहेत. सुजाता जोशी यांना पिसथनमध्ये भाग घ्यायचा होता. आॅनलाईन रजिस्ट्रेशन करताना अडचण सोडविण्यासाठी जोशी या मुख्याध्यापिकेकडे आल्या. तेवढ्यात दहा-बारा वर्षाची ५ वीत शिकणारी मुलगी प्राचार्यांना आत येवू का, असे विचारत होती. तिच्या हातात ५०० रूपयाची नोट होती. त्यापूर्वी प्राचार्यांनी घरातील ठेवून असलेल्या तीन स्कूल बॅग शाळेतील काही गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले होते. त्यानुसार १८ सप्टेंबरला तीन पैकी दोन स्कूल बॅग शाळेच्या दोन विद्यार्थिनींना वितरीत करण्यात आल्या होत्या व एक बॅग शाळेत ठेवण्यात आली होती. पाचवीच्या वर्गशिक्षीकेला बोलावून वर्गात दप्तर नसलेल्या दोन मुलींची निवड करून त्यांना दप्तर द्या, असे प्राचार्यांनी सांगितले होते.या दोनही मुलींनी दप्तर दिल्यानंतर त्यापैकी वैष्णवी मारोतराव मोहुर्ले या मुलीला मिळालेल्या दप्तराच्या बॅगमध्ये ५०० रूपयाची नोट सापडली होती. ती नोट परत आणून देण्यासाठी ती प्राचार्यांना आता येवू का म्हणून परवानगी मागत होती. तिचा हा प्रामाणीकपणा पाहून प्राचार्या काही वेळ भारावूनच गेल्या.या घटनेने आजही प्रामाणीकता जीवंत असल्याचा परिचय प्राचार्या कोटगीरवार यांना आला. तिला बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे हे शक्य होवू शकले, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.तिसरी बॅगही वैष्णवीला दिली भेटवैष्णवीचा प्रामाणिकपणा पाहून भारावलेल्या प्राचार्य जयश्री कोटगीरवार यांनी त्या विद्यार्थीनीला त्यांच्याजवळ शिल्लक असलेली तिसरी बॅग भेट म्हणून दिली तिचे विद्यार्थ्यासमोर कौतुकही केले.या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यानी नवा आदर्श निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शाळेच्यावतीने वेळोवेळी विद्यार्थीनी करीता व्यक्तीमत्व विकासाचे शिबीर घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात यामुळे अशा घटना सुखद आनंद देवून जातात, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी