शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

विद्यार्थ्यांना राहावे लागते उपाशी

By admin | Updated: January 28, 2015 23:37 IST

येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात

मागासवर्गीय वसातिगृहात समस्यांचा अंबार : समाजकल्याण कार्यालयात आंदोलन वर्धा: येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला बदलविण्याची मागणी येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. याकडे समाजकल्याण विभागाने दुर्लक्ष केल्याने बुधवारी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. समाजकल्याण सहायक आयुक्त आंदोलनस्थळापासून गेले मात्र त्यांनी यावर कुठलीही चर्चा केली नाही. सायंकाळपर्यंत विद्यार्थी तिथेच बसून होते. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुरुवातीपासून भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून होत असलेल्या अनागोंदीच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या विषयाबाबत अनेकदा वसतिगृह गृहपाल व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. कायमस्वरुपी तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवठाधारकाकडून वारंवार त्रासाला व अनियमिततेला सामोरे जावे लागत आहे. १५ आॅगस्ट २०१४ व त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्येही भोजन पुरवठाधारक बदलविण्याबाबत विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. यावेळी समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी परत घेतली होती. या आश्वासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांना वेळेवर नाश्ता मिळत नाही, फळांचा नियमित पुरवठा होत नाही. शिवाय मानकानुसार सकाळी दूध देणे गरजेचे असताना तेही मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या तुलनेत दूध कमी येत आहे. त्यात वाढ करण्याची मागणी केली असता दुधात पाणी टाकूण देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय भोजन पुरवठाधारक विद्यार्थ्यांच्या हातून ताट हिसकावून घेत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. जेवणासाठी वापरल्या जाणारे खाद्य तेल, आटा, दाळ, तांदुळ यांचा दर्जा निकृष्ट असल्याचाही आरोप आहे. यात विद्यार्थ्यांना काही मागणी केल्यास मद्यधुंद अवस्थेत वसतिगृहात येवून विद्यार्थ्यांना शिवीगाळ करीत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याकरिता जोपर्यंत समाजकल्याण सहायक आयुक्त येत नाही तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही, अशी भूमिका अमित दिवे, विकेश तिमांडे, गिरीधर चंदनखेडे, सुदर्शन भगत, निलेश मेश्राम, पवन घंगाळे, रोशन खडसे, सुरज वानखेडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी घेतली.(प्रतिनिधी)