शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

विद्यार्थ्यांना राहावे लागते उपाशी

By admin | Updated: January 28, 2015 23:37 IST

येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात

मागासवर्गीय वसातिगृहात समस्यांचा अंबार : समाजकल्याण कार्यालयात आंदोलन वर्धा: येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून मानकानुसार जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे. असा आरोप करून वसतिगृहात अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला बदलविण्याची मागणी येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. याकडे समाजकल्याण विभागाने दुर्लक्ष केल्याने बुधवारी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी आंदोलन केले. समाजकल्याण सहायक आयुक्त आंदोलनस्थळापासून गेले मात्र त्यांनी यावर कुठलीही चर्चा केली नाही. सायंकाळपर्यंत विद्यार्थी तिथेच बसून होते. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ च्या सुरुवातीपासून भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून होत असलेल्या अनागोंदीच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या विषयाबाबत अनेकदा वसतिगृह गृहपाल व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. कायमस्वरुपी तोडगा निघाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवठाधारकाकडून वारंवार त्रासाला व अनियमिततेला सामोरे जावे लागत आहे. १५ आॅगस्ट २०१४ व त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्येही भोजन पुरवठाधारक बदलविण्याबाबत विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. यावेळी समाजकल्याण विभागाकडून मिळालेल्या आश्वासनाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी परत घेतली होती. या आश्वासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांना वेळेवर नाश्ता मिळत नाही, फळांचा नियमित पुरवठा होत नाही. शिवाय मानकानुसार सकाळी दूध देणे गरजेचे असताना तेही मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या तुलनेत दूध कमी येत आहे. त्यात वाढ करण्याची मागणी केली असता दुधात पाणी टाकूण देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय भोजन पुरवठाधारक विद्यार्थ्यांच्या हातून ताट हिसकावून घेत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. जेवणासाठी वापरल्या जाणारे खाद्य तेल, आटा, दाळ, तांदुळ यांचा दर्जा निकृष्ट असल्याचाही आरोप आहे. यात विद्यार्थ्यांना काही मागणी केल्यास मद्यधुंद अवस्थेत वसतिगृहात येवून विद्यार्थ्यांना शिवीगाळ करीत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याकरिता जोपर्यंत समाजकल्याण सहायक आयुक्त येत नाही तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही, अशी भूमिका अमित दिवे, विकेश तिमांडे, गिरीधर चंदनखेडे, सुदर्शन भगत, निलेश मेश्राम, पवन घंगाळे, रोशन खडसे, सुरज वानखेडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी घेतली.(प्रतिनिधी)