शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत ...

ठळक मुद्देवीजतारा, झाडे उन्मळूृन पडली, अनेक घरे व गोठ्यांवरील टिनपत्रेही उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत लाखोंची हानी केली. पुन्हा एकाच दिवसाच्या फरकाने आलेल्या सुसाट चक्रीवादळाने उर्वरित केळी पिकांची वाट लागली. घरावरील छत, टिनपत्रे दूरपर्यंत उडून गुले. रस्त्याच्या कडेला असलेला एक लोखंडी पानठेला २०० मीटर उडून गेला. सेलू, बेलगाव व आजूबाजूच्या काही गावांना मोठा फटका बसला. इतरही गावात वादळाने मोठे नुकसान केले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्याच वादळातील तुटलेला वीजतारा खांब सुरळीत करतांना त्रेधातिरपीट उडाली तर पुन्हा वादळाने वीजतारा तुटला व खांब वाकल्याने त्यांचे हाल सुरू आहे.आंजी (मोठी) येथे विजेवरील उपकरणे निकामीआंजी (मोठी) : शनिवारी रात्री विजेचा कडकडाट व वादळी वाºयासह पाऊस झाला. विजेच्या कडकडाटामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील दीपक वनवे यांच्याकडील कॅमेरा, डीव्हीआर, दूरचित्रवाणी संच, सेटटॉप बॉक्स आणि दिवे, शिव डोंगरे यांच्याकडील दूरचित्रवाणी संच निकामी झाले. तर निखिल मिसाळ यांच्याकडील लाईट व पंखे जळाले. यामुळे संबंधितांचे नुकसान झाले.घोराडात वादळवारा, गारपीटघोराड : सतत येत असलेले वादळी वारे पुन्हा एकदा शनिवारी मध्यरात्री धडकल्याने शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. शनिवारी कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल शासन दप्तरी तयार होणार, तोच शनिवारी रात्री ११.४५ ला वादळीवाºयाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटाने सर्वांची झोप उडविली. एक तासाहून अधिक काळ वादळाचे थैमान सुरू होते. दरम्यान अनेकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. शेतातील गोठ्यांची पडझड झाली. केळीच्या पानांची दुर्दशा झाली. आता काही जण केळी उपटून पºहाटी लावण्याचा मार्ग शोधत आहे. सतत झालेल्या वादळवाºयामुळे वीज वितरण कर्मचाºयांची तारांबळ उडत आहे. शेतातील कृषिपंप सुरू करायचे की, गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. वीज वितरण घोराड शाखेअंतर्गत सुकळी, कोटंबा, घोराड, मोही असा विस्तीर्ण परिसर आहे. वीज कर्मचाºयांची कमतरता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणीची ठरत आहे. वाकलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असल्याने शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वादळी वाºयासह पावसाने गावखेड्यातील पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊस