शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

आर्वी (लहान) येथे वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:42 IST

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देअनेक घरांवरील छप्पर उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. गावातील अनेक घरांवरील छप्पर उडाल्याचे दिसून आले. यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले.असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी रसुलाबाद येथे घडला. यात एका युवा व्यावसायिकाच्या कुक्कुटपालन केंद्रावरील छत उडाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. तर अल्लीपूर परिसरात काल सांयकाळी आलेल्या पावसामुळेही मोठे नुकसान झाले. रसुलाबाद लगतच्या (बऱ्हा) सोनेगाव येथील नागरिकांना या वादळाचा फटका बसला. यात बरेच कुटुंब उघड्यावर आल्याने प्रहार संघटनेकडून त्यांना मदत देण्यात आली.आपतग्रस्तांना प्रहार संघटनेकडून मदतीचा हातगुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा रसुलाबादसह बाऱ्हा सोनेगाव या गावांना मोठा तडाखा बसला. या वादळामुळे येथील अनेक कुटुंब उघड्यावर आले. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य व प्रहारच्या महिला जिल्हा प्रमुख अरुणा राजेश सावरकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुलगाव देवळी मतदार संघाचे प्रमुख राजेश सावरकर हे बाऱ्हा सोनेगाव येथे पोहोचले. या वादळापूर्वीही २७ मे २०१८ ला असाच प्रकार या गावांत झाला होता, त्यात प्रशासकीय अधिकारी अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून लगेचच आम्ही मदत देऊ असे जाहीर केले. मात्र यांची मदत मिळाली नसल्याने गावकरी दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यात एसडीओ शर्मा यांनी दोन दिवसात मदत पोहोचेल असे म्हटले होते, परंतु अजूनही त्यांना मदत मिळाली नाही. बाऱ्हा सोनेगाव हे गाव १०० टक्के कोलाम वस्तीचे आहे, त्यात चक्री वादळाने तेथील घरावरील टिन पत्रे उडून गेले, कवेलु उडून गेले, भिंती पडल्या, पोल पडले, लाईन तार तुटून पडल्या. त्यातल्या त्यात पत्रे उडून गेल्याने घरांमध्ये पाणी साचले. यात घरातील धनधान्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्या. दिवस कसा काढावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यामुळे या संघटनेतर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. या वादळात जखमी झालेल्या गर्भवती महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी आनंद राठी, अजय भोयर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.विजेचे खांबही कोसळलेशुक्रवारी आलेल्या या वादळात घरावरील टिनपत्रे उडून गेले. सोबतच गावाला विघुत पुरवठा करणारे खांबही कोसळले यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली; मात्र त्यांच्याकडून रात्रभर दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. याचा त्रास मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावात जावून झालेल्या नुकसानाची पाहणी करून ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही गावात सांयकाळपर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे दिसून आले. यामुळे कामाला गती देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस