शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

आर्वी (लहान) येथे वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:42 IST

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देअनेक घरांवरील छप्पर उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. गावातील अनेक घरांवरील छप्पर उडाल्याचे दिसून आले. यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले.असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी रसुलाबाद येथे घडला. यात एका युवा व्यावसायिकाच्या कुक्कुटपालन केंद्रावरील छत उडाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. तर अल्लीपूर परिसरात काल सांयकाळी आलेल्या पावसामुळेही मोठे नुकसान झाले. रसुलाबाद लगतच्या (बऱ्हा) सोनेगाव येथील नागरिकांना या वादळाचा फटका बसला. यात बरेच कुटुंब उघड्यावर आल्याने प्रहार संघटनेकडून त्यांना मदत देण्यात आली.आपतग्रस्तांना प्रहार संघटनेकडून मदतीचा हातगुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा रसुलाबादसह बाऱ्हा सोनेगाव या गावांना मोठा तडाखा बसला. या वादळामुळे येथील अनेक कुटुंब उघड्यावर आले. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य व प्रहारच्या महिला जिल्हा प्रमुख अरुणा राजेश सावरकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुलगाव देवळी मतदार संघाचे प्रमुख राजेश सावरकर हे बाऱ्हा सोनेगाव येथे पोहोचले. या वादळापूर्वीही २७ मे २०१८ ला असाच प्रकार या गावांत झाला होता, त्यात प्रशासकीय अधिकारी अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून लगेचच आम्ही मदत देऊ असे जाहीर केले. मात्र यांची मदत मिळाली नसल्याने गावकरी दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यात एसडीओ शर्मा यांनी दोन दिवसात मदत पोहोचेल असे म्हटले होते, परंतु अजूनही त्यांना मदत मिळाली नाही. बाऱ्हा सोनेगाव हे गाव १०० टक्के कोलाम वस्तीचे आहे, त्यात चक्री वादळाने तेथील घरावरील टिन पत्रे उडून गेले, कवेलु उडून गेले, भिंती पडल्या, पोल पडले, लाईन तार तुटून पडल्या. त्यातल्या त्यात पत्रे उडून गेल्याने घरांमध्ये पाणी साचले. यात घरातील धनधान्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्या. दिवस कसा काढावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यामुळे या संघटनेतर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. या वादळात जखमी झालेल्या गर्भवती महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी आनंद राठी, अजय भोयर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.विजेचे खांबही कोसळलेशुक्रवारी आलेल्या या वादळात घरावरील टिनपत्रे उडून गेले. सोबतच गावाला विघुत पुरवठा करणारे खांबही कोसळले यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली; मात्र त्यांच्याकडून रात्रभर दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. याचा त्रास मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावात जावून झालेल्या नुकसानाची पाहणी करून ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही गावात सांयकाळपर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे दिसून आले. यामुळे कामाला गती देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस