शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी (लहान) येथे वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:42 IST

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देअनेक घरांवरील छप्पर उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसासह वादळी वारा येत असल्याचे दिसून आले आहे. या वादळामुळे नागरिकांचे रोजच नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील लहान (आर्वी) परिसरात या वादळाचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. गावातील अनेक घरांवरील छप्पर उडाल्याचे दिसून आले. यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले.असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी रसुलाबाद येथे घडला. यात एका युवा व्यावसायिकाच्या कुक्कुटपालन केंद्रावरील छत उडाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. तर अल्लीपूर परिसरात काल सांयकाळी आलेल्या पावसामुळेही मोठे नुकसान झाले. रसुलाबाद लगतच्या (बऱ्हा) सोनेगाव येथील नागरिकांना या वादळाचा फटका बसला. यात बरेच कुटुंब उघड्यावर आल्याने प्रहार संघटनेकडून त्यांना मदत देण्यात आली.आपतग्रस्तांना प्रहार संघटनेकडून मदतीचा हातगुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा रसुलाबादसह बाऱ्हा सोनेगाव या गावांना मोठा तडाखा बसला. या वादळामुळे येथील अनेक कुटुंब उघड्यावर आले. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य व प्रहारच्या महिला जिल्हा प्रमुख अरुणा राजेश सावरकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुलगाव देवळी मतदार संघाचे प्रमुख राजेश सावरकर हे बाऱ्हा सोनेगाव येथे पोहोचले. या वादळापूर्वीही २७ मे २०१८ ला असाच प्रकार या गावांत झाला होता, त्यात प्रशासकीय अधिकारी अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून लगेचच आम्ही मदत देऊ असे जाहीर केले. मात्र यांची मदत मिळाली नसल्याने गावकरी दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. त्यात एसडीओ शर्मा यांनी दोन दिवसात मदत पोहोचेल असे म्हटले होते, परंतु अजूनही त्यांना मदत मिळाली नाही. बाऱ्हा सोनेगाव हे गाव १०० टक्के कोलाम वस्तीचे आहे, त्यात चक्री वादळाने तेथील घरावरील टिन पत्रे उडून गेले, कवेलु उडून गेले, भिंती पडल्या, पोल पडले, लाईन तार तुटून पडल्या. त्यातल्या त्यात पत्रे उडून गेल्याने घरांमध्ये पाणी साचले. यात घरातील धनधान्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्या. दिवस कसा काढावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यामुळे या संघटनेतर्फे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. या वादळात जखमी झालेल्या गर्भवती महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी आनंद राठी, अजय भोयर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.विजेचे खांबही कोसळलेशुक्रवारी आलेल्या या वादळात घरावरील टिनपत्रे उडून गेले. सोबतच गावाला विघुत पुरवठा करणारे खांबही कोसळले यामुळे गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली. याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली; मात्र त्यांच्याकडून रात्रभर दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. याचा त्रास मात्र गावकऱ्यांना सहन करावा लागल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावात जावून झालेल्या नुकसानाची पाहणी करून ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही गावात सांयकाळपर्यंतही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे दिसून आले. यामुळे कामाला गती देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस