शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

जीवनावश्यक साहित्याची केली घरांमध्ये साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे.

ठळक मुद्देनवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी नागरिकांची किराणा दुकानांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना (कोविड-१९) ची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या लॉक डाऊनला कुणी घाबरू नये. शिवाय या दिवसांमध्ये जीवनावश्यक साहित्यांचे दुकाने आणि औषधीची दुकाने दिलेल्या वेळेत नियमित सुरू राहतील असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धान्य, तेल, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्याची खरेदीकरण्यासाठी सदर साहित्याच्या दुकानांकडे नागरिकांनी एकच धाव घेतल्याचे बुधवारी दिसून आले.संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. परंतु, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली. शिवाय अनेक नागरिकांनी किमान महिन्याभराचे राशन घरी नेले. कुणी सायकलवर तर कुणी दुचाकी गाडीने हे जीवनावश्यक साहित्य घरी नेताना दिसले.कमविला जातोय जादा मुनाफानागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील किराणा व्यावसायिकांची दुकाने ठरवून दिलेल्या कालावधीत खुली ठेवण्याची मुबा देण्यात आली आहे. परंतु, याच संधीचे सोने काही किराणा व्यावसायिक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून किमान १०० रुपयांची वस्तू तब्बल १५० रुपयांपर्यंत विक्री करून जादा मुनाफाच सध्या कमविल्या जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार नागरिकांची आर्थिक लुट करणारा ठरत असल्याने निगरानी पथकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई - एसडीएमजीवनावश्यक वस्तूंची कुणी साठेबाजी करीत असेल तर त्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांसह मला थेट द्यावी. जीवनावश्यक वस्तंूची साठेबाजी करणाऱ्यांवर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जादा मुनाफा कमवू पाहणाºया व्यापाºयांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल. इतकेच नव्हे तर अशा मुनाफाखोरांच्या दुकानाला सील ठोकून दुकानातील धान्य शासन दरबारी जमा करण्यात येईल, असे उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणारजिल्हाधिकारी : नागरिकांनी घाबरून जाऊ नयेवर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉक डाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण आहे. जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाºया वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनला घाबरून जाण्याची गरज नाही. या काळात नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवणावश्यक वस्तूंची दुकाने नेहमी प्रमाणे रोज मर्यादित कालावधीसाठी उघडी राहणार आहेत. भाजी आणि दूध सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत आणि अन्नधान्य व किराणा दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील १४४ कलम आहे ती तशीच लागू राहील, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस