शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जीवनावश्यक साहित्याची केली घरांमध्ये साठवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे.

ठळक मुद्देनवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी नागरिकांची किराणा दुकानांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना (कोविड-१९) ची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या लॉक डाऊनला कुणी घाबरू नये. शिवाय या दिवसांमध्ये जीवनावश्यक साहित्यांचे दुकाने आणि औषधीची दुकाने दिलेल्या वेळेत नियमित सुरू राहतील असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धान्य, तेल, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्याची खरेदीकरण्यासाठी सदर साहित्याच्या दुकानांकडे नागरिकांनी एकच धाव घेतल्याचे बुधवारी दिसून आले.संचार बंदीच्या काळात भाजीपाला व दुध विक्रीचे केंद्र सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत तर किराणा व धान्याची दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत आणि औषधीची दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. तर पेट्रोलपंप सकाळी ७ ते दुपारी ५ याच वेळेत सुरू राहणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होईल, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. परंतु, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांकडे धाव घेतली. शिवाय अनेक नागरिकांनी किमान महिन्याभराचे राशन घरी नेले. कुणी सायकलवर तर कुणी दुचाकी गाडीने हे जीवनावश्यक साहित्य घरी नेताना दिसले.कमविला जातोय जादा मुनाफानागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील किराणा व्यावसायिकांची दुकाने ठरवून दिलेल्या कालावधीत खुली ठेवण्याची मुबा देण्यात आली आहे. परंतु, याच संधीचे सोने काही किराणा व्यावसायिक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून किमान १०० रुपयांची वस्तू तब्बल १५० रुपयांपर्यंत विक्री करून जादा मुनाफाच सध्या कमविल्या जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार नागरिकांची आर्थिक लुट करणारा ठरत असल्याने निगरानी पथकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई - एसडीएमजीवनावश्यक वस्तूंची कुणी साठेबाजी करीत असेल तर त्याची तक्रार थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांसह मला थेट द्यावी. जीवनावश्यक वस्तंूची साठेबाजी करणाऱ्यांवर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जादा मुनाफा कमवू पाहणाºया व्यापाºयांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल. इतकेच नव्हे तर अशा मुनाफाखोरांच्या दुकानाला सील ठोकून दुकानातील धान्य शासन दरबारी जमा करण्यात येईल, असे उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणारजिल्हाधिकारी : नागरिकांनी घाबरून जाऊ नयेवर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉक डाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्वपूर्ण आहे. जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाºया वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी २१ दिवसांच्या लॉक डाऊनला घाबरून जाण्याची गरज नाही. या काळात नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवणावश्यक वस्तूंची दुकाने नेहमी प्रमाणे रोज मर्यादित कालावधीसाठी उघडी राहणार आहेत. भाजी आणि दूध सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत आणि अन्नधान्य व किराणा दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील १४४ कलम आहे ती तशीच लागू राहील, असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस