शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

लोंबकळत्या तारांमुळे वीजपुरवठा खंडीत

By admin | Updated: July 23, 2014 23:46 IST

बोपापूर येथील नागरिक वारंवार खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहे. भारनियमनाच्या त्रासासह खंडित वीजपुरवठयामुळे येथील ग्रामस्थांवर बरेचदा काळोखात राहण्याची वेळ येते. वीजपुरवठा खंडित

पोहणा : बोपापूर येथील नागरिक वारंवार खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहे. भारनियमनाच्या त्रासासह खंडित वीजपुरवठयामुळे येथील ग्रामस्थांवर बरेचदा काळोखात राहण्याची वेळ येते. वीजपुरवठा खंडित होण्यास लोंबकळणाऱ्या तारा कारणीभूत असून त्याची दुरुस्ती केली जात नाही. तक्रार करुनही वीज वितरणचे कर्मचारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित असल्याने समस्या कायम आहे.गावातील विद्युत खांबावरील तारा गेल्या अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. वाराच्या झोताने गावालगतच असलेल्या अ‍ॅड. चांभारे यांचे शेतातून गेलेल्या तारांचा तर सहजतेने स्पर्श करता येईल इतक्या अंतरावर येवून पोहचला. शेताची मशागत करताना विद्युत पुरवठा बंद करूनच मशागत करावी लागते. ही बाब वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहित असतानासुद्धा त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. गावात ठिकठिकाणी तारा झाडांना स्पर्शून गेलेल्या आहेत. झाडांच्या फांद्यांपासून त्यास दूर न करता बोपापूर येथून राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या गेलेल्या रस्त्यावरील खांबांचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पथदिवे बंद पडले आहे. वारा किंवा पाऊस यामुळे सदर तारांचा एकमेकांना स्पर्श होवून नेहमीच विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे बोपापूर वासियांना अंधारात रहावे लागत आहे. या लोंबकळत असलेल्या तारा नागरिकांच्या जीवितास धोकादायक आहे. काही भागात तर रस्त्याने जात असलेल्या माणसाला या तारांचा स्पर्श होतो. या तारांचा स्पर्श झाल्याने करंट लागून नाहक प्राणाला मुकण्याची वेळ आहे. मात्र संबंधित विभाग याकडे डोळेझाकपणा करीत सल्याने मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.यासंबंधी नागरिकांना अनेकदा तक्रारी केल्या, परंतु संबंधीत मस्तवाल कर्मचारी मात्र नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेताना दिसतो. वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन या लोंबकळत असलेल्या तारा दुरुस्त करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.(वार्ताहर)