लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व जनावरांची काळजी व आजारांपासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत मान्सूनपूर्व जनावरांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण १ लाख २८ हजार लससाठा उपलब्ध झाला असून एकूण ४ लाख ८९ हजार पाळीव जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.पावसाळ्यात जनावरांना विविध आथीचे आजार उद्भवू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते. तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनाचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार, लाळ खुरकूत, तोंडखुरी आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात १०६ पशुवैद्यक दवाखाने असून या दवाखान्यांना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. गाई-म्हशींकरिता घटसर्पच्या ४८ हजार, एकटांग्या ५२ हजार आणि शेळ्यांकरिता आंत्रविषारच्या २८ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात गाई आणि म्हशींची संख्या ३ लाख २२ हजार ५२९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९ तर ५ हजार ३५८ मेंढ्यांची संख्या आहे. पशुसंवर्धन विभागाच्या फिरते पथकाद्वारे जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे.शेतकरी पशुपालकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती माधन चंदनखेडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. आर. वानखेडे, डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी केले आहे.पशुपालकांना आवाहनजिल्ह्यात जिल्हा परिषद आणि राज्य शासन असे एकूण १०६ पशुवैद्यक दवाखाने असून या सर्व दवाखान्यांना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. या दवाखान्यांमार्फत पशुधनाला लसीकरण करण्यात येणार आहे. पशुपालकांनी जनावरांच्या संरक्षणासाठी लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पशुधनासाठी १ लाख २८ हजार लसींचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST
पावसाळ्यात जनावरांना विविध आथीचे आजार उद्भवू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते.
पशुधनासाठी १ लाख २८ हजार लसींचा साठा
ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८९ हजार पशुधन : पशुसंवर्धन विभागाकडून मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम सुरू