शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी पावलं टाकावी लागतील - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:57 IST

सामूहिक वनहक्कधारक आदिवासी वन निवासी गावांची ग्रामसभा परिषद

सेवाग्राम (वर्धा) : वनहक्कांसंदर्भात जल, जमीन, जंगल या तिघांचा महत्त्वाचा घटक हा आदिवासींशी निगडित आहे. खऱ्या अर्थाने तो मालक आहे. वन संपत्ती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माण झालेल्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी एकाच विचारधारेच्या आणि या व्यासपीठावरून सोडविण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. गावाचा विकास मुंबई, दिल्लीत बसून होणार नाही तर तो ग्रामसभेत झाला पाहिजे. त्यासाठी नेटवर्क तयार करा. गावातील या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते असावे आणि आदिवासींचे जीवन कसे समृद्ध करता येईल, या दृष्टीने पावले टाकावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

नयी तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे राज्यस्तरीय सामूहिक वनहक्कधारक आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी गावांची ग्रामसभा परिषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदिवासी विकास केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा याप्रसंगी खा. पवार यांनी केली. राज्यातील संस्था, त्यांची प्रश्ने, राज्य व केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन सोडविण्याचा प्रयत्न करतील. आदिवासींना वनवासी म्हणतात. यांच्यासाठी वेगळे धोरणही राबवित आहे. या मार्गाने आपल्याला जायचे नाही आणि तडजोडसुद्धा करायची नाही, असेही खा. पवार म्हणाले.

याप्रसंगी पुर्णिमा उपाध्याय यांनी वन व शेतीवर काम करणारा आदिवासींवर वन विभाग दबाव टाकीत असून त्यांना जंगलविरोधी करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी गरीब असल्याने मूठभर लोकांनी त्यांचे साधन हिसकावून घेतले. जंगलात राहण्यावर अन्याय होत आहे. ग्रामसभेचा प्रतिनिधी जंगल सुधारणांचे काम करीत आहे, असे सांगितले. याप्रसंगी माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी आ. प्रा. सुरेश देशमुख, अमित कळसकर, मोतीराम सयाम, सुरेखा ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. दिलीप गोडे यांनी तर आभार डॉ. किशोर मोघे यांनी मानले. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे, छत्तीसगड राज्यातील ७०० ते ८०० विविध संस्थांचे, गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSocialसामाजिकwardha-acवर्धा