शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी पावलं टाकावी लागतील - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:57 IST

सामूहिक वनहक्कधारक आदिवासी वन निवासी गावांची ग्रामसभा परिषद

सेवाग्राम (वर्धा) : वनहक्कांसंदर्भात जल, जमीन, जंगल या तिघांचा महत्त्वाचा घटक हा आदिवासींशी निगडित आहे. खऱ्या अर्थाने तो मालक आहे. वन संपत्ती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माण झालेल्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी एकाच विचारधारेच्या आणि या व्यासपीठावरून सोडविण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. गावाचा विकास मुंबई, दिल्लीत बसून होणार नाही तर तो ग्रामसभेत झाला पाहिजे. त्यासाठी नेटवर्क तयार करा. गावातील या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते असावे आणि आदिवासींचे जीवन कसे समृद्ध करता येईल, या दृष्टीने पावले टाकावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

नयी तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे राज्यस्तरीय सामूहिक वनहक्कधारक आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी गावांची ग्रामसभा परिषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदिवासी विकास केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा याप्रसंगी खा. पवार यांनी केली. राज्यातील संस्था, त्यांची प्रश्ने, राज्य व केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन सोडविण्याचा प्रयत्न करतील. आदिवासींना वनवासी म्हणतात. यांच्यासाठी वेगळे धोरणही राबवित आहे. या मार्गाने आपल्याला जायचे नाही आणि तडजोडसुद्धा करायची नाही, असेही खा. पवार म्हणाले.

याप्रसंगी पुर्णिमा उपाध्याय यांनी वन व शेतीवर काम करणारा आदिवासींवर वन विभाग दबाव टाकीत असून त्यांना जंगलविरोधी करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी गरीब असल्याने मूठभर लोकांनी त्यांचे साधन हिसकावून घेतले. जंगलात राहण्यावर अन्याय होत आहे. ग्रामसभेचा प्रतिनिधी जंगल सुधारणांचे काम करीत आहे, असे सांगितले. याप्रसंगी माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी आ. प्रा. सुरेश देशमुख, अमित कळसकर, मोतीराम सयाम, सुरेखा ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. दिलीप गोडे यांनी तर आभार डॉ. किशोर मोघे यांनी मानले. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे, छत्तीसगड राज्यातील ७०० ते ८०० विविध संस्थांचे, गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSocialसामाजिकwardha-acवर्धा