शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

आदिवासींचे जीवन समृद्ध करण्यासाठी पावलं टाकावी लागतील - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:57 IST

सामूहिक वनहक्कधारक आदिवासी वन निवासी गावांची ग्रामसभा परिषद

सेवाग्राम (वर्धा) : वनहक्कांसंदर्भात जल, जमीन, जंगल या तिघांचा महत्त्वाचा घटक हा आदिवासींशी निगडित आहे. खऱ्या अर्थाने तो मालक आहे. वन संपत्ती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माण झालेल्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी एकाच विचारधारेच्या आणि या व्यासपीठावरून सोडविण्यासाठी चर्चा झाली पाहिजे. गावाचा विकास मुंबई, दिल्लीत बसून होणार नाही तर तो ग्रामसभेत झाला पाहिजे. त्यासाठी नेटवर्क तयार करा. गावातील या क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते असावे आणि आदिवासींचे जीवन कसे समृद्ध करता येईल, या दृष्टीने पावले टाकावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

नयी तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे राज्यस्तरीय सामूहिक वनहक्कधारक आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी गावांची ग्रामसभा परिषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदिवासी विकास केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा याप्रसंगी खा. पवार यांनी केली. राज्यातील संस्था, त्यांची प्रश्ने, राज्य व केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन सोडविण्याचा प्रयत्न करतील. आदिवासींना वनवासी म्हणतात. यांच्यासाठी वेगळे धोरणही राबवित आहे. या मार्गाने आपल्याला जायचे नाही आणि तडजोडसुद्धा करायची नाही, असेही खा. पवार म्हणाले.

याप्रसंगी पुर्णिमा उपाध्याय यांनी वन व शेतीवर काम करणारा आदिवासींवर वन विभाग दबाव टाकीत असून त्यांना जंगलविरोधी करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी गरीब असल्याने मूठभर लोकांनी त्यांचे साधन हिसकावून घेतले. जंगलात राहण्यावर अन्याय होत आहे. ग्रामसभेचा प्रतिनिधी जंगल सुधारणांचे काम करीत आहे, असे सांगितले. याप्रसंगी माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी आ. प्रा. सुरेश देशमुख, अमित कळसकर, मोतीराम सयाम, सुरेखा ठाकरे उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. दिलीप गोडे यांनी तर आभार डॉ. किशोर मोघे यांनी मानले. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे, छत्तीसगड राज्यातील ७०० ते ८०० विविध संस्थांचे, गावातील प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSocialसामाजिकwardha-acवर्धा