शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

नदी जोड प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:10 AM

विदर्भातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत केली. वर्धा व अमरावती जिल्ह्यांसह विदर्भात दुष्काळी परिस्थिती बिकट आहे.

ठळक मुद्देलोकसभेत खा. रामदास तडस यांची मागणी : नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत केली. वर्धा व अमरावती जिल्ह्यांसह विदर्भात दुष्काळी परिस्थिती बिकट आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात ३५ टक्क्यांंपेक्षा कमी जलसाठा असून धरणांमध्ये केवळ ३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे धरणे पुरेशी भरली नाहीत. त्यामुळे विदर्भवासियांना उन्हाळ्यात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. ज्यामुळे अनेक गावामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याच्या नियोजनाकरिता सर्व नद्याचे सर्वेक्षण करुन सर्व नदी एकमेकाला जोडण्याकरिता नदी जोड प्रकल्पाला गती देवून कार्य प्रारंभ करण्याबाबतचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. विदर्भात नदी जोड प्रकल्प राबविल्यास ज्या नदी बारामाही वाहत नाही त्या नदी बारामाही वाहतील तसेच पाण्याचा होणारा अपव्यय थांबेल, त्यामुळे जलस्तर वाढण्यास मदत होईल. प्रत्येक गावात, शहरी पाणी पुरवठ्याची व्यवस्था अधिक समाधानकारक करता येईल, असे तडस यांनी यावेळी सांगितले.मातृवंदना व अंगणवाडी सेवा, पोषण आहार अभियानात भरीव तरतूदवर्धा : कुपोषण ही भारतातील अतिशय महत्त्वाची समस्या आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. किंबहुना पूरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येईल. संपुर्ण देशातील कुपोषन दुर व्हावी तसेच केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनेच्या अनुषंगाने खासदार रामदास तडस यांनी केंद्र सरकारच्यावतीने मुलांच्या कुपोषणाची समस्या दूर करण्याकरिता कोणते पाऊल उचलेले आहे. याकरिता सरकारने तीन वर्षामध्ये किती वित्तीय सहाय्यता दिली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय मानदंडाच्या अनुसार मुलांना पोषक आहार देण्याकरिता कोणते पाऊल उचलेले आहे याबाबत लोकसभेचे लक्ष वेधले.खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महिला व बाल विकास मंत्री स्मृति जुबिन ईरानी यांनी लेखी उत्तरात कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारने नवी उपाययोजना आखली असल्याची माहिती दिली. घरोघरी जाऊन आदिवासींना पोषक आहाराचे महत्त्व पटवून देणे, सरकारच्या योजनांचा समन्वय साधताना आदिवासी समुदायामध्ये जनजागृती निर्माण करणे असे उपाय करण्यात येणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या आदिवासी विभागातर्फे हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये पोषण आहाराकरिता रु. ९०४६ कोटी रुपये निधी आवंटीत केलेला आहे. यामध्ये अंगणवाडी सेवा, पोषण अभियान, किशोरी करिता योजना, गर्भवती महिलाकरिता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश आहे. पोषण आहारा अंतर्गत २०१८-१९ करिता २०९ कोटी रुपयेची तरतुद, लहान मुलींच्या कल्याणाकरिता सन २०१८-१९ करिता ५४ कोटीची तरतुद अंगवाडी सेवा स्कीम व पोषण आहार अंतर्गंत सन २०१८-१९ करिता ५५७ कोटी रुपयाची तरतुद, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेकरिता सन २०१८-१९ करिता ११७ कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र राज्याकरिता भारत सरकारने केली असल्याचे संसदेत सांगितले. या सर्व ताराकिंत प्रश्नाला लोकसभमध्ये लेखी तथा प्रत्यक्षपणे मौखीक उत्तर मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आले. सदर प्रश्नामुळे महाराष्ट्र राज्याला प्राप्त होणाऱ्या अंगणवाडी सेवा, पोषण अभियान, किशोरी करिता योजना, गर्भवती महिलाकरिता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला अनुदानात वाढ होईल.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस