शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कांजण्या, गालगुंडची पसरतेय साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो.

ठळक मुद्देलहान मुलांमध्ये अधिक प्रमाण : काळजी घेण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणात बदल होताच जिल्ह्यात संसर्गजन्य असलेल्या कांजण्या आणि गालगुंड आजाराने डोके वर काढले असून लहान मुलांमध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो. ‘मम्प्स’ अर्थात गालगुंड हा पसरणाऱ्या विषाणूंपासून होणारा संसर्ग असून लहान मुलांमध्ये याचे मोठे प्रमाण आहे. या आजाराचा विषाणू तोंडावाटे अथवा नाकावाटे हवेण्या कणांमार्फत प्रवेश करतो. आणि हवेवाटे पसरतो. विषाणूच्या संसर्गाच्या १४ ते २५ दिवसांनंतर गालगुंडची लक्षणे जाणवतात. बाधित व्यक्तीला त्याचे तोंड आणि नाक शिंकताना आणि खोकताना इतर व्यक्तीला संसर्ग पसरू नये म्हणून झाकून ठेवणे गरजेचे आहे. गालगुंडची सुजलेला नाजूक जबडा, डोकेदुखी, स्रायूंचे दुखणे, जबड्यामध्ये सूज येणे, तोंड कोरडे पडणे, भूक कमी होणे, ताप, अशक्तपणा, वृषणांमध्ये दुखणे, चिडचिडेपणा ही तर ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे, हलकेसे पोट दुखणे, अस्वस्थता अशी कांजण्या आजाराची लक्षणे आहेत.जिल्हा रुग्णालयात अद्याप रुग्ण नाहीतजिल्ह्यात या आजाराने डोके वर काढले असले तरी सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण दाखल झालेले नाहीत, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल येळणे यांनी दिली.कांजण्या आणि गालगुंड हे दोन्ही संसर्गजन्य आजार असून संपर्कातून या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. शहरात या आजाराचे रुग्ण आढळून येत असून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. याकरिता पालकांनी पाल्याला आजारी असताना शाळेत पाठविणे टाळावे, जेणेकरून आजाराचा फैलाव होणार नाही. बाधित व्यक्तीने आवश्यक औषधोपचार घेत पाण्याने अंग पुसावे, भरपूर पाणी प्यावे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य