शहरं
Join us  
Trending Stories
1
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
2
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
3
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
4
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
5
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
6
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
7
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
8
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
9
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
10
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
12
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
13
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
15
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
16
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
17
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
18
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
19
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
20
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी

कांजण्या, गालगुंडची पसरतेय साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो.

ठळक मुद्देलहान मुलांमध्ये अधिक प्रमाण : काळजी घेण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणात बदल होताच जिल्ह्यात संसर्गजन्य असलेल्या कांजण्या आणि गालगुंड आजाराने डोके वर काढले असून लहान मुलांमध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो. ‘मम्प्स’ अर्थात गालगुंड हा पसरणाऱ्या विषाणूंपासून होणारा संसर्ग असून लहान मुलांमध्ये याचे मोठे प्रमाण आहे. या आजाराचा विषाणू तोंडावाटे अथवा नाकावाटे हवेण्या कणांमार्फत प्रवेश करतो. आणि हवेवाटे पसरतो. विषाणूच्या संसर्गाच्या १४ ते २५ दिवसांनंतर गालगुंडची लक्षणे जाणवतात. बाधित व्यक्तीला त्याचे तोंड आणि नाक शिंकताना आणि खोकताना इतर व्यक्तीला संसर्ग पसरू नये म्हणून झाकून ठेवणे गरजेचे आहे. गालगुंडची सुजलेला नाजूक जबडा, डोकेदुखी, स्रायूंचे दुखणे, जबड्यामध्ये सूज येणे, तोंड कोरडे पडणे, भूक कमी होणे, ताप, अशक्तपणा, वृषणांमध्ये दुखणे, चिडचिडेपणा ही तर ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे, हलकेसे पोट दुखणे, अस्वस्थता अशी कांजण्या आजाराची लक्षणे आहेत.जिल्हा रुग्णालयात अद्याप रुग्ण नाहीतजिल्ह्यात या आजाराने डोके वर काढले असले तरी सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण दाखल झालेले नाहीत, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल येळणे यांनी दिली.कांजण्या आणि गालगुंड हे दोन्ही संसर्गजन्य आजार असून संपर्कातून या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. शहरात या आजाराचे रुग्ण आढळून येत असून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. याकरिता पालकांनी पाल्याला आजारी असताना शाळेत पाठविणे टाळावे, जेणेकरून आजाराचा फैलाव होणार नाही. बाधित व्यक्तीने आवश्यक औषधोपचार घेत पाण्याने अंग पुसावे, भरपूर पाणी प्यावे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य