शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

ढगाळी वातावरण अन् पावसामुळे सोयाबीन कापणीसह मळणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:33 IST

दिवाळीच्या तोंडावर पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असल्याने सोयाबीनला दिवाळी बोनस असेच म्हणल्या जाते. इतकचे नव्हे तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ३३ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. या संकटातून शेतकरी बाहेर आला नाहीच तो जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या सोयाबीन पिकाचे तब्बल ६५ टक्के नुकसान झाले, तर आता ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून होणाऱ्या कोसळधार पावसामुळे थेट सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असल्याने सोयाबीनला दिवाळी बोनस असेच म्हणल्या जाते. इतकचे नव्हे तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ३३ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच करावी लागली. या संकटाला मोठ्या धाडसाने शेतकऱ्यांनी ताेंड देत नाहीच तो अंकुरलेले सोयाबीन पीक वाढीच्या स्थितीत असतानाच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरस्थितीचे संकटही ओढावले. याच अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या संकटामुळे तब्बल ६५ टक्के सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर पूरस्थिती आणि अतिवृष्टीच्या संकटातून बचावल्या सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने ते सध्या कापणीच्या स्थितीत आले आहे; पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या ढगाळी वातावरणासह पावसामुळे सोयाबीन कापणी व मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मुख्यालयातील बाजारपेठेत आवक घटली- ऐरवी ऑक्टोबर महिन्यापासून शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर येण्यास सुरुवात होते. गत वर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू झाली असली तरी गत वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठत आवक चांगलीच घटल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मागील वर्षी १ ते ११ ऑक्टाेबर या काळात वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी सोयाबीनची २ हजार ७९६ पोती आली होती, तर यंदा १ ते ११ ऑक्टोबर या काळात वर्धा बाजार समितीच्या यार्डवर केवळ २६५ पोतीच सोयाबीन विक्रीसाठी आल्याची नोंद घेण्यात आली आहे.

सोयाबीन पिकाची अंकुरण होण्याची भीती- ढगाळी वातावरण आणि परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापणीला उशीर होत आहे. ऐन कापणीच्या वेळी अचानक पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अंकुरण होऊन आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवड्यात वातावरण साफ असल्यास सोयाबीन कापणी व मळणीच्या कामाला गतीच मिळणार आहे. पण यंदा शेतकऱ्यांना निसर्ग साथ देते काय हे वेळच सांगणार आहे.

आठ दिवसांपूर्वी अनेकांनी उरकविली कापणीसह मळणी- गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. इतकेच नव्हे तर थांबून थांबून दामिणी गर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतजमीन ओली झाली असून हार्वेस्टरही शेतात जात नाही. त्यामुळे कापणी व मळणी कशी करावी, असाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. तर आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने सोयाबीनची मळणी केल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती