शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळी वातावरण अन् पावसामुळे सोयाबीन कापणीसह मळणीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 22:33 IST

दिवाळीच्या तोंडावर पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असल्याने सोयाबीनला दिवाळी बोनस असेच म्हणल्या जाते. इतकचे नव्हे तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ३३ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. या संकटातून शेतकरी बाहेर आला नाहीच तो जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उभ्या सोयाबीन पिकाचे तब्बल ६५ टक्के नुकसान झाले, तर आता ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून होणाऱ्या कोसळधार पावसामुळे थेट सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असल्याने सोयाबीनला दिवाळी बोनस असेच म्हणल्या जाते. इतकचे नव्हे तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ३३ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच करावी लागली. या संकटाला मोठ्या धाडसाने शेतकऱ्यांनी ताेंड देत नाहीच तो अंकुरलेले सोयाबीन पीक वाढीच्या स्थितीत असतानाच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत पूरस्थितीचे संकटही ओढावले. याच अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या संकटामुळे तब्बल ६५ टक्के सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर पूरस्थिती आणि अतिवृष्टीच्या संकटातून बचावल्या सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने ते सध्या कापणीच्या स्थितीत आले आहे; पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात आलेल्या ढगाळी वातावरणासह पावसामुळे सोयाबीन कापणी व मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मुख्यालयातील बाजारपेठेत आवक घटली- ऐरवी ऑक्टोबर महिन्यापासून शेतकऱ्याचे सोयाबीन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर येण्यास सुरुवात होते. गत वर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू झाली असली तरी गत वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठत आवक चांगलीच घटल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मागील वर्षी १ ते ११ ऑक्टाेबर या काळात वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर विक्रीसाठी सोयाबीनची २ हजार ७९६ पोती आली होती, तर यंदा १ ते ११ ऑक्टोबर या काळात वर्धा बाजार समितीच्या यार्डवर केवळ २६५ पोतीच सोयाबीन विक्रीसाठी आल्याची नोंद घेण्यात आली आहे.

सोयाबीन पिकाची अंकुरण होण्याची भीती- ढगाळी वातावरण आणि परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापणीला उशीर होत आहे. ऐन कापणीच्या वेळी अचानक पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अंकुरण होऊन आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवड्यात वातावरण साफ असल्यास सोयाबीन कापणी व मळणीच्या कामाला गतीच मिळणार आहे. पण यंदा शेतकऱ्यांना निसर्ग साथ देते काय हे वेळच सांगणार आहे.

आठ दिवसांपूर्वी अनेकांनी उरकविली कापणीसह मळणी- गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. इतकेच नव्हे तर थांबून थांबून दामिणी गर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतजमीन ओली झाली असून हार्वेस्टरही शेतात जात नाही. त्यामुळे कापणी व मळणी कशी करावी, असाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. तर आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने सोयाबीनची मळणी केल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती