शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची २६.६९ लाखांनी केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:42 IST

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : काकडे पुन्हा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परवानाधारक दलालाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन पीक खरेदी करून त्याचा मोबदला न देता तब्बल २६ लाख ६९ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोहन ज्ञानेश्वर अवचट (रा. पवनार) याच्या घरी वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील परवानाधारक दलाल असलेला कैलास अजाब काकडे (रा. यशवंत कॉलनी) वर्धा हा गेला त्याने मोहनकडे असलेला सोयाबीन माल पाहून हा माल मलाच विका मी तुमच्या मालाचा चांगला भाव देईल व शेतमालाची रक्कम देखील तुम्हाला लवकर देईल, असे सांगून मोहनला विश्वासात घेऊन मोहन याने २०१७,२०१८ आणि २०१९ मध्ये शेतात पिकवलेला ५८२ क्विंटल व १८३ क्विंटल सोयाबीन आरोपी कैलास काकडे याने २९ लाख ६९ हजार ९२० रुपयांचा विकत घेतला. त्यापैकी आरोपीने मोहनला २ लाख ९० हजार रुपये रोखीने दिले. उर्वरित २६ लाख ६९ हजार ९२० रुपयांची रकमेचे इंडियन बँकेचे धनादेश २०२४ मध्ये दिले. मोहन हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत गेला असता आरोपी कैलासच्या खात्यावर २०२२ पासून एकही रुपया नसल्याची माहिती मिळाली.

यावरून आरोपी कैलास काकडे याने खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही धनादेश दिल्याने मोहन यांची २६ लाख ६९ हजार ९२० रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीfraudधोकेबाजी