शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

साधलेल्या दुबार पेरण्या अतिवृष्टीने दडपल्या

By admin | Updated: July 28, 2014 23:41 IST

यंदा कोरडा गेलेल्या मृग नक्षत्राच्या शेवटी व आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एक-दोन वादळी पावसाने शेतजमिनी न्हाऊन निघाल्या़ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण नंतर पुर्नवसू

खरांगणा (मो़) : यंदा कोरडा गेलेल्या मृग नक्षत्राच्या शेवटी व आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एक-दोन वादळी पावसाने शेतजमिनी न्हाऊन निघाल्या़ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण नंतर पुर्नवसू नक्षत्रापर्यंत पाऊसच आला नाही़ यात सर्व बियाणे नष्ट झाले़ यानंतर १७-१८ तारखेपासून पावसाच्या सरी कोसळल्याने दुबार पेरण्या केल्या़ काही शेतकऱ्यांचे बियाणे अंकुरले; पण सोमवार, मंगळवारी अतिवृष्टीने झाल्याने ते ही दडपल्या गेले़ अस्मानी संकटाच्या फटक्याने शेतकरी संकटात सापडला आहे़परिसरात कपाशी, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके आहेत़ मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचा फटका बसल्याने यावर्षी कपाशीचा पेरा वाढलेला दिसून येतो़ ओलिताची सोय असलेले शेतकरी वगळता कपाशी व तूर या पिकांची दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली़ पेरण्या साधल्या, बियाणे अंकुरले; पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत बियाणे दडपले गेले़ काही ठिकाणी बियाणे वाहून गेले तर काही शेतात गाळात रूतली़ यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले असून कर्जाचा डोंगर त्याच्या वाढला आहे़ सोयाबीनची पेरणी झालेले बियाणे तर जमिनीत गायब झाले आहे़ ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, तेथील अंकुर सडण्याच्या मार्गावर आहे़ यामुळे शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही़ पीक कर्जाची रक्कम बियाण्यांतच खर्ची पडली तर समोरची मशागत, खते, औषधी, निंदण, खुरपन ही कामे कशी करावीत, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़मागील वर्षी पावसाची नक्षत्रे संपल्यानंतरही संततधार पाऊस होता़ यामुळे सोयाबीनचे उत्पन्न अपवाद वगळता पूर्णत: बुडाले़ जे निघाले त्यालाही किंमत आली नाही़ कपाशीचे उत्पन्न जेमतेम झाले़ यात भाववाढीच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या़ त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यास बसला़ अनेकांना कर्जाची परतफेड करता आली नाही म्हणून यावर्षी पुन्हा सावकाराच्या दारी जावे लागले़ ग्रामीण व शहरी भागातील कृषीकेंद्र चालकांनी व्याजबट्ट्याचे तोंडी करार करून बियाणे, खते, औषधी शेतकऱ्यांना पुरविणे सुरू केले आहे़ एवढेच नव्हे तर मशागतीकरिता लागणारा खर्चही नगदी स्वरूपात दुकानदाराजवळून शेतकरी पर्याय नसल्याने व्याजाने घेत आहे़ दुकानदार शेतीसाहित्याच्या मालाची आगाऊ बिले फाडून शेतकऱ्यांच्या उधारी खात्यावर वळते करतो़ इतर अवैध सावकारी करणारे खोडा खरेदीचे आधारभूत भाव (निघणाऱ्या उत्पन्नाचे) आताच ठरवून शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी आल्याबरोबर मोजून आपल्या घरी नेतो़ असा हा शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटणारा प्रकार जोमाने सुरू झाला आहे़ अवैध सावकारी नष्ट करण्याच्या हेतूने केलेला सावकारी अधिनियम कायदा या व्यवहारांना आड येत असल्याचे समजते़एकंदरीत शेती व संसाराची वहीवाट करताना अस्मानी व सुलतानी संकटाशी शेतकऱ्याला लढावे लागत आहे़ कर्जाचा डोंगर चढत असल्याने मुलींचे लग्ने, शिक्षण, आजार व जनावरांची हानी या दुष्टचक्रातून बाहेर पडणे अशक्य होत आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे सध्या गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)