शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

साधलेल्या दुबार पेरण्या अतिवृष्टीने दडपल्या

By admin | Updated: July 28, 2014 23:41 IST

यंदा कोरडा गेलेल्या मृग नक्षत्राच्या शेवटी व आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एक-दोन वादळी पावसाने शेतजमिनी न्हाऊन निघाल्या़ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण नंतर पुर्नवसू

खरांगणा (मो़) : यंदा कोरडा गेलेल्या मृग नक्षत्राच्या शेवटी व आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एक-दोन वादळी पावसाने शेतजमिनी न्हाऊन निघाल्या़ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण नंतर पुर्नवसू नक्षत्रापर्यंत पाऊसच आला नाही़ यात सर्व बियाणे नष्ट झाले़ यानंतर १७-१८ तारखेपासून पावसाच्या सरी कोसळल्याने दुबार पेरण्या केल्या़ काही शेतकऱ्यांचे बियाणे अंकुरले; पण सोमवार, मंगळवारी अतिवृष्टीने झाल्याने ते ही दडपल्या गेले़ अस्मानी संकटाच्या फटक्याने शेतकरी संकटात सापडला आहे़परिसरात कपाशी, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके आहेत़ मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचा फटका बसल्याने यावर्षी कपाशीचा पेरा वाढलेला दिसून येतो़ ओलिताची सोय असलेले शेतकरी वगळता कपाशी व तूर या पिकांची दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली़ पेरण्या साधल्या, बियाणे अंकुरले; पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत बियाणे दडपले गेले़ काही ठिकाणी बियाणे वाहून गेले तर काही शेतात गाळात रूतली़ यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले असून कर्जाचा डोंगर त्याच्या वाढला आहे़ सोयाबीनची पेरणी झालेले बियाणे तर जमिनीत गायब झाले आहे़ ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, तेथील अंकुर सडण्याच्या मार्गावर आहे़ यामुळे शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही़ पीक कर्जाची रक्कम बियाण्यांतच खर्ची पडली तर समोरची मशागत, खते, औषधी, निंदण, खुरपन ही कामे कशी करावीत, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़मागील वर्षी पावसाची नक्षत्रे संपल्यानंतरही संततधार पाऊस होता़ यामुळे सोयाबीनचे उत्पन्न अपवाद वगळता पूर्णत: बुडाले़ जे निघाले त्यालाही किंमत आली नाही़ कपाशीचे उत्पन्न जेमतेम झाले़ यात भाववाढीच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या़ त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यास बसला़ अनेकांना कर्जाची परतफेड करता आली नाही म्हणून यावर्षी पुन्हा सावकाराच्या दारी जावे लागले़ ग्रामीण व शहरी भागातील कृषीकेंद्र चालकांनी व्याजबट्ट्याचे तोंडी करार करून बियाणे, खते, औषधी शेतकऱ्यांना पुरविणे सुरू केले आहे़ एवढेच नव्हे तर मशागतीकरिता लागणारा खर्चही नगदी स्वरूपात दुकानदाराजवळून शेतकरी पर्याय नसल्याने व्याजाने घेत आहे़ दुकानदार शेतीसाहित्याच्या मालाची आगाऊ बिले फाडून शेतकऱ्यांच्या उधारी खात्यावर वळते करतो़ इतर अवैध सावकारी करणारे खोडा खरेदीचे आधारभूत भाव (निघणाऱ्या उत्पन्नाचे) आताच ठरवून शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी आल्याबरोबर मोजून आपल्या घरी नेतो़ असा हा शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटणारा प्रकार जोमाने सुरू झाला आहे़ अवैध सावकारी नष्ट करण्याच्या हेतूने केलेला सावकारी अधिनियम कायदा या व्यवहारांना आड येत असल्याचे समजते़एकंदरीत शेती व संसाराची वहीवाट करताना अस्मानी व सुलतानी संकटाशी शेतकऱ्याला लढावे लागत आहे़ कर्जाचा डोंगर चढत असल्याने मुलींचे लग्ने, शिक्षण, आजार व जनावरांची हानी या दुष्टचक्रातून बाहेर पडणे अशक्य होत आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे सध्या गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)