शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

३ हजार ५०० गारपीटग्रस्तांची वीज देयके माफ

By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST

राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले़ या नुकसानीकरिता आपादग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात

रूपेश मस्के - कारंजा (घा़)

 राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले़ या नुकसानीकरिता आपादग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सुट देण्यात येणार आहे़ याचा लाभ तालुक्यातील ३ हजार ५०० गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार आहे़ त्यांची जानेवारी ते जून २०१४ ची वीज देयके महावितरणला राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येणार आहे़ राज्यात फेब्रुवारी-मार्च २०१४ या कालावधीत गारपीट व अवकाळी पाऊस झाला़ यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली़ या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ यात बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विशेष पॅकेज देण्यात येणार आहे़ कारंजा तालुक्यातील गहु ७४२ हेक्टर, चना ७१७ हेक्टर, संत्रा, मोसंबी २३३ हेक्टर, व इतर ७० हेक्टर असे एकूण १ हजार ७६५ हेक्टरचे ३ हजार ५०० शेतकरी नुकसानग्रस्त आहेत़ त्यांच्या याद्या विद्युत वितरण विभागाने कृषी अधिकारी कारंजा यांना मागितल्या असून ज्या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत आहे, अशांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून बाधित शेतकर्‍यांची अधिकृत माहिती घेऊन अमंलबजावणी करण्याचे आदेशित केले आहे. यानुसार कृषी पंपधारक गारपीटीने बाधित यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांचे वीज देयके माफ होणार आहे. शेतकर्‍यांच्या बाधित यादीतील नाव, वीज क्रमांक, जानेवारी ते मार्च वीज बिलाची रक्कम व एप्रिल ते जून बिलाची रक्कम अशी माहिती पुरवायची आहे. नापिकी व कर्जबाजारी, अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.