सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा
By Admin | Updated: June 11, 2014 23:28 IST2014-06-11T23:28:36+5:302014-06-11T23:28:36+5:30
शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत.

सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा
वर्धा : शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यामळे शेतकरी व सामान्यांच्या समस्या प्राधान्याने
सोडवा य आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी, वर्धा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सादर केले.
निवेदनानुसार शेतीव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देवून २४ तास विद्यूत पुरवठा होणे आवश्यक आहे. वडनेर ते वडकी या २० कि़मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण अनुदान प्राप्त असून २०१२ पर्यंत तो पूर्ण करायचा होता. पण अद्यापही तो अपूर्ण व बिकट अवस्थेत असून अपघात व जीवितहानीचे प्रमाण सतत वाढत आहे. संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्याकरिता तात्काळ आदेशीत करून होणारी जीवितहानीसाठी टाळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली.
त्याचप्रमाणे हिंगणघाट ते पार्डी नगाजी रस्त्यावरील पूल खचलेला असून दळणवळण ठप्प आहे. तेव्हा पुल नव्याने त्वरीत दुरूस्त करावा, वडनेर ते तिर्थक्षेत्र आजनसरा मार्गाचे रूंदीकरण करून उत्तम दर्जाची सुधारणा करावी यासह विविध मागण्यांबाबत
शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यासोबत निवेदन देतेवेळी चर्चा करण्यात आली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही करण्यात आली. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास १९ जून २०१४ रोजी राष्ट्रीय
महामार्ग क्र. ७ वर वडनेर गावानजिक रस्तारोको आंदोलन करण्यासंदर्भातही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, मुख्य सल्लागार प्रल्हाद तुराहे, संघटक जयंत कातरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, राहुल सोरटे, गजानन चिडे, हर्षद घोरपडे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)