शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तर ‘त्या’ डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होत्या.

ठळक मुद्देसुनील केदार : जिल्हाधिकारी कार्यालयात कारोनासंदर्भात घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी इतर जिल्हा व राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीची माहिती २४ तासात जमा केली गेली पाहिजे. त्यांना तात्काळ विलगीकरणाच्या सूचना देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तसेच भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पशुपालकांकडून दूध घेण्यास नकार देण्याऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होत्या.राष्ट्रीय आपत्ती आणि साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करणे ही शासन, प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बाजार समित्या, डेअरी, दूध विक्री संघ हे शेतकऱ्यांकडून भाजी आणि दूध घेण्यास नकार देत असतील आणि त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होत असेल तर अशा समित्या आणि संघावर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी. जीवनावश्यक वस्तू दुकानांच्या व्यतिरिक्त सुरू राहणाºया इतर दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणि भविष्यातील अडचणी याचाही आढावा घेतला.लॉकडाऊनमधून यांना वगळण्यात आलेजीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाºया कंपन्यांना शासनाने लॉकडाऊन मधून वगळले आहे. तसेच शेतीची कामे सुद्धा यातून वगळण्यात आली आहेत. पशुखाद्य दुकाने सुरू ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसेच याची वाहतूक करणाºया वाहतुकदारांना सुद्धा लॉकडाऊन मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.जनजागृतीकरिता सामाजिक संस्थांचा सहभाग घ्याकोरोना विषाणूचे संक्रमण जास्त वाढू नये म्हणून शासनाने संचार बंदी लागू केली आहे. संचारबंदीचा उद्देश लोकांना समजून सांगा. जनतेमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती करा. नागरिकांनी स्वत:हून संचारबंदी लावून घेतली तर पोलिसांचा ताण कमी होईल. याकामी सामाजिक संस्थांचा सहभाग घ्या. असेही पालकमंत्री यांनी सांगितले.दोन महिने पुरेल इतका धान्यसाठा उपलब्धजिल्ह्यात अन्नधान्यसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढा असून अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मुबलक साठा आहे . तेलाचे उत्पादन करणाऱ्या आॅइल मील मालकाशी चर्चा करण्यात येत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून साखर येत आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधल्या जात असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.जिल्ह्यात एकही कोरणाबाधित नाहीतजिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. पण प्रशासन अलर्ट आहे. अलगिकरण कक्ष तयार आहेत. मास्क, सॅनिटायझर, औषधी यांचे पुरवठा आदेश देण्यात आले असून एक, दोन दिवसात आपल्याकडे त्याचा मुबलक साठा असेल. तसेच नर्सेस आणि डॉक्टरांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस