शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

सहा गुरुजींकडून पेशालाच काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी आल्यावर वागणूक बिघडली की ‘शाळेत हेच शिकवितात का?’ असे विचारले जाते तर शाळेत विद्यार्थ्याला ‘घरी असेच शिकवितात का?’ असा प्रश्न केला जातो. त्यामुळे घरामागे शाळा आणि शाळेमागे घर असं हे विद्यार्थी दशेतील समीकरण आहे.

ठळक मुद्देचौघांवर अत्याचाराचा ठपका : दोघांनी मद्य प्राशन करून घातला धिंगाणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाची पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. पालकानंतर शिक्षकालाच गुरूचे स्थान दिले आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील काही गुरुजींकडूनच आपल्या पेशाला काळीमा फासल्या जात असल्याचे जिल्ह्यातील विविध पाच घटनांवरून पुढे आले आहे. शाळेमध्येही विद्यार्थी व विद्यार्र्थिनी सुरक्षीत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या संरक्षणार्थ शाळा स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी आल्यावर वागणूक बिघडली की ‘शाळेत हेच शिकवितात का?’ असे विचारले जाते तर शाळेत विद्यार्थ्याला ‘घरी असेच शिकवितात का?’ असा प्रश्न केला जातो. त्यामुळे घरामागे शाळा आणि शाळेमागे घर असं हे विद्यार्थी दशेतील समीकरण आहे.पालकांप्रमाणे शिक्षकांचीही मोठी जबाबदारी असल्याने पालक विश्वासामुळेच आपल्या पाल्याला शाळेत घालतो. बहुतांश शिक्षकांनी अज्ञानाच्या खाणीतून हिरे घडविले आहे तर, काहींनी उमलत्या कळ्याच खुडल्याचे प्रकरण पुढे आले आहे. नुकताच भोसा येथील प्रकरणाने पालकांत चिड निर्माण झाली आहे. शिक्षकांवरील विश्वास उडायला लागला असून शाळेतही विद्यार्थी असुरक्षीत असल्याची भावना व्यक्त होत आहे.जिल्ह्यात २०१५ पासून तब्बल सहा शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून पेशालाच काळीमा फासला आहे. त्यापैकी देवळी, सेलू, हिंगणघाट व भोसा येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अत्याचाराचा ठपका ठेवण्यात आला. त्यापैकी तीन शिक्षकांवर निलंबनाची तर भोसा येथील शिक्षकावर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासोबत मद्यप्राशन करुन जिल्हा परिषदमध्ये गोंधळ घालणाºया आष्टीच्या तर मद्यधुंद अवस्थेत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धिंगाणा घालणाºया चाणकीच्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. एका दोघाच्या अशा कृत्यामुळे इतरही शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असून शिक्षण विभागानेही योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.गेल्यावर्षी दोन, यावर्षी तिघांवर कारवाईशिक्षकांकडून कर्तव्यात कसूर करण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी अत्याचार व विनयभंगप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर यावर्षी दोन महिन्यांमध्येच तीन शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.दोन शिक्षकांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याने त्यांना निलंबित तर एका शिक्षकाला अत्याचार प्रकरणी बडतर्फ केले.शाळांची समित्यांकडे पाठशाळेतील विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक-पालक समिती आणि महिला तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक आहे. शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष पालक तर सचिव मुख्याध्यापक असतात. तसेच महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष महिला पालक, सचिव शाळेतील शिक्षिका व इतर पालक सदस्य असतात. बहुतांश शाळांमध्ये या समित्यांचे कागदोपत्री गठण केले जातात. शिक्षक पालक समिती स्थापन होत असली तरी महिला तक्रार निवारण समिती गठित करताना अडचण होते. बहुतांश शाळांमध्ये महिला शिक्षक नाही. म्हणून आता प्रत्येक शाळेत या समित्या आहे की नाही, तक्रारीअंती दखल घेतात की नाही, याची शहानिशा करण्याची गरज आहे.संघटनेच्या आड चालविला उपद्रवशिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने शिक्षकांच्याही संघटना कार्यरत आहे. पण, काही शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचा आडोसा घेत पेशाला काळीमा फासण्याचा उपद्रव चालविल्याचे नुकताच घडलेल्या प्रकारावरुन पुढे आले आहे. यापूर्वी एकाने विद्यादानाचे कार्य सोडून आपलपोटेपणा सुरु केल्याने निलंबनाला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्हा परिषदेत लुडबूड करुन पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जवळचीच शाळा मिळविली. तेथेही कुरापती सुरुच ठेवल्याने शिक्षिकेकडून विनयभंगाची तक्रार करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला गालबोट लावण्यांवर कठोर कारवाई हाच पर्याय आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी