साहेब! धान्य संपले हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:41+5:30

रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प झाल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.

Sir! The grain is gone ... | साहेब! धान्य संपले हो...

साहेब! धान्य संपले हो...

ठळक मुद्देसहा कु टूंबियांचा टाहो : नाथजोगीच्या कुटुंबाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क
विरुळ (आकाजी) : मागील दोन महिन्यांपासून अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधात विरूळ येथे आलेल्या नाथजोगी समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडील धान्यसाठा संपत आला असून साहेब...धान्य संपले हो, अशी आर्त हाक ते प्रशासनाकडे करीत आहे.
रोजगाराच्या शोधात विरुळ येथे नाथजोगी समाजाचे सहा कुटूंबातील सुमारे ३० ते ४० सदस्य विरूळ नजीक एका शेतात पाल टाकून वास्तव्य करीत आहे. स्टो, गॅस शेगडी दुरुस्ती किंवा पलंग विकणे हा त्यांचा मुळ व्यवसाय आहे. लॉकडाऊन असल्याने मागील महिन्यांपासून कामकाज ठप्प झाल्याने त्यांच्यासमोर अडचण निर्माण झाली आहे.
सीमा बंद असल्याने कुटूंबीयांना गावाकडेही परत जाता येत नसल्याने लहान चिमुकल्यांना कडेवर घेऊन बसस्थानक परिसरालगतच्या शेतात पाल ठोकून ते वास्तव्य करीत आहेत. लॉकडाउनमुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची माहिती आर्वी महसूल प्रशासनाला मिळताच १५ दिवसांपूर्वी त्यांना पाच किलो तांदूळ व गव्हाचे वाटप केले. पण, आता त्यांच्याकडील धान्यपुरवठा संपत आल्याने त्यांच्यावर संकट ओढावले असून आम्हाला धान्य द्या हो... अशी आर्त हाक प्रशासनाकडे ते करीत आहे. मात्र कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही. लॉकडाऊन संपेपर्यंत पुरेल एवढा धान्यसाठा त्यांना देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Web Title: Sir! The grain is gone ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.