शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सिग्नलचे डोळे अद्याप मिटलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:01 PM

वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. सिग्नल्सचे डोळे अद्याप मिटलेलेच आहेत. यापूर्वीही या यंत्रणेवर लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. त्यामुळे केलेला खर्च पुन्हा पाण्यात जाणार का? या प्रश्नाने वर्धेकरांच्या मनात घर केले आहे.

ठळक मुद्देपुन्हा जाणार का खर्च व्यर्थ? : नागरिकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात पुन्हा एकदा वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात आले आहेत. सिग्नल्सचे डोळे अद्याप मिटलेलेच आहेत. यापूर्वीही या यंत्रणेवर लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. त्यामुळे केलेला खर्च पुन्हा पाण्यात जाणार का? या प्रश्नाने वर्धेकरांच्या मनात घर केले आहे.वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता, अपघात टाळण्याच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये लाखो रुपये खर्च करून हे दिवे लावण्यात आले आहेत. विकासकामांच्या बाबतीत वरातीमागून घोडे असाच काहीस प्रत्यय येत आहेत. कुठलेही नियोजन नाही. रस्त्याची बांधकामे सुरू असताना आजही अनेक ठिकाणी वीजखांब उभे आहेत. बहुतांश ठिकाणचे अतिक्रमण न काढताच काम सुरू आहे. कुठे लावलेले पेव्हिंग ब्लॉक्स काढण्यात येत आहेत आणि परत लावलेही जात आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधकामे पूर्णत्वास गेल्यानंतर अमृत योजना आणि भुयारी गटार योजनेकरिता रस्तांचे फोडकाम सुरू आहे. ही कामे करताना कुणाचा कुणाशीही समन्वय नाही. एकाच कामावर दुबार-तिबार निधी खर्ची घातला जात असल्याने कर व इतर स्वरूपात शासनाच्या तिजोरीत गोळा झालेल्या जनतेच्याच पैशाची वारेमाप उधळपट्टी केली जात असल्याचे याचि देही याचि डोळा दिसते आहे. मात्र, यावर कुणीही काही बोलायला तयार नाही. पालिका, जिल्हा परिषद आणि दोन विधानसभा मतदारसंघ वगळता संपूर्ण जिल्हा भाजपमय आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीच विकासकामे मंजूर करून आणीत आहे, कामात नियोजनाचा अभाव असल्याची तेच ओरड करीत आहे आणि चौकशीही मागणीही याच पक्षातील नेतेमंडळी करीत असून जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचाच प्रयत्न केला जात आहे.वास्तविक, रस्त्याची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर सिग्नल्स उभारण्याची गरज होती. असे असताना कित्येक महिन्यांपासून सिग्नल्स केवळ उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल वाहनाच्या धडकेत दोनदा आडवाही झाला. इतरही दिव्यांवर वाहने आदळतच आहेत. दिवे बंदच ठेवायचे होते, तर हे काम पूर्वीच आटोपण्याचा खटाटोप का करण्यात आला, असा सवाल वर्धेकरांतून उपस्थित केला जात आहे.सिग्नल दोनवेळा झाले भुईसपाट!शिवाजी महाराज चौकात नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर मधोमध सिग्नल लावण्यात आला होता. मात्र, वाहनांच्या धडकेने दोनवेळा भुईसपाट झाला. यानंतर प्रशासनाने सिग्नल उभारण्याचे धाडसच दाखविले नाही.नगरपालिकेकडून नियमित देयक अदा केले जात नसल्याने यापूर्वी उभारण्यात आलेले सिग्नल्स कधीही सुरळीत नव्हते. आता नव्याने उभारण्यात आलेले देयक तरी सुरळीत राहणार का, की यावर झालेला खर्चही व्यर्थ जाणार, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.