शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

‘जवाद’चा झटका; उभ्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 5:00 AM

जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंगालची खाडी तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शिवाय ‘जवाद’ चक्रीवादळ आध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडकल्याने विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूणच जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. परंतु, थोड्या अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे कापणी पश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

कुटारही भिजले- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाची जोड दिली आहे. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मालकीचे सोयाबीनचे कुटार पावसामुळे भिजल्याने त्यांना सध्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर केला जात असल्याने जनावरांसाठी हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले असल्याचे वृद्ध शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

आपण यंदा १५ एकर शेतजमिनीत सोयाबीनची लागवड केली. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे कापणीपश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे.- सुभाष घायवट, सोयाबीन उत्पादक, पढेगाव.

पूर्वीच कापूस वेचणीसाठी मजूर सहज मिळत नाही. गावाबाहेरून मजूर आणून शेतीची कामे करावी लागत आहेत. अशातच शनिवारी परिसरात झालेल्या पावसामुळे झाडाला लागलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळून दिली पाहिजे.- नरेश झोड, कापूस उत्पादक, चिकणी.

उन्हाळ्यात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आपण सोयाबीनच्या मळणीनंतर शेतात सोयाबीनचे कुटार ढीग करून ठेवले होते. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण कुटार भिजले. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शिवाय उन्हाळ्यात जनावरांसाठीचे वैरण बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहे. हिरवा चाराही सध्या सहज मिळत नाहीच.- किशोर लुंगे, सोयाबीन उत्पादक, जामणी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती