शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शशी थरुर यांनी सेवाग्रामध्ये चालवला चरखा, महात्मा गांधींना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 11:36 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा.डॉ. शशी थरूर यांनी सकाळी ९.१५ वा. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमला भेट दिली.

वर्धा ( सेवाग्राम): सध्या अ. भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाही उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी बृजलाल खाबरी यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशी नियुक्ती करणे चुकीचे आहे, अशी नाराजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार खा. शशी थरूर यांनी व्यक्त केली. शशी थरुन सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज गांधी जयंतीदिनी त्यांनी महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामला भेट दिली. यावेळी, सूत कातण्याचं कामही त्यांनी केलं. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा.डॉ. शशी थरूर यांनी सकाळी ९.१५ वा. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमला भेट दिली. त्यांच्यासोबत आशिष देशमुख होते.आगमन झाल्यानंतर बापू कुटीत मौन प्रार्थना झाली. खा.शशी थरूर यांनी आठ बॉबीनचा अंबर चरखाही यावेळी चालविला. महात्मा गांधींच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून थरुर यांनी सेवाग्राममध्ये गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केले. 

सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरू असून अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना दलित चेहरा म्हणून समोर केले जात असताना शशी थरूर यांनी शनिवारी नागपुरात दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. यानंतर त्यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी थरूर यांचे स्वागत केले. 

निवडणूक पारदर्शी हवी आहे

राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनाही पारदर्शी निवडणूक हवी आहे. ते कुणालाही समर्थन देणार नाहीत हेदेखील स्पष्ट आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी समर्थन दिले असून देशभरातील प्रतिनिधींकडूनही समर्थन मिळत आहे. पक्षाचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी सर्वच राज्यांची प्रदेश प्रतिनिधींची यादी दिली आहे. मात्र, बऱ्याच राज्यांच्या यादीमध्ये प्रदेश प्रतिनिधींची पूर्ण नावे नाहीत. काहींचे पत्ते तर काहींचे मोबाइल नंबरही नाहीत. त्यामुळे उरलेल्या १६ दिवसांत सर्वांशी संपर्क साधणे एक मोठे आव्हान आहे. ५० टक्के तिकिटे ही ५० वर्षे वयाखालील व्यक्तींना दिली जावीत, असा ठराव जयपूरच्या शिबिरात घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसwardha-acवर्धा