शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते ‘जेल’ची हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगलेलेच बरे, अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.  नागरिकांनी लाईक, शेअर, फॉरवर्ड जपून करण्याची गरज असल्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राजकीय वादात कारण नसताना गुन्हा घडेल, या पद्धतीने मतप्रदर्शन करणे, एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील, अशा पद्धतीने मेसेज पोस्ट करणे, एखाद्या तरुण, तरुणीची बदनामी करण्यासाठी फेक प्राेफाईल बनविणे, असे सर्व प्रकार फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रती असलेले अज्ञान आणि आततायीपणा सायबर गुन्हेगारीला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या असून सायबर सेलकडे तक्रारी येत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगलेलेच बरे, अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.  नागरिकांनी लाईक, शेअर, फॉरवर्ड जपून करण्याची गरज असल्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.  सध्या सायबर भामटे  सक्रीय झाले असून विविध प्रकारे गंडविण्याचे नवनवे फंडे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या मेल्स तसेच लिंकपासूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून nसोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सावधानता बाळगून वापर करण्याची गरज आहे.  फेक बॅंकिंग ॲप, फेक वेबसाईट, नायजेरियन फ्राॅड, फेसबुक फ्राॅड, क्लोनिंग, आयडेंटिटी चोरी, हनी ट्रॅप,  अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मुलींनो, डीपी सांभाळाnमुलींनी फेसबुकवर स्वत:चे प्रोफाईल फोटो ठेवू नये, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच प्राेफाईल लॉक करून ठेवावी. तसेच व्हॉट्सॲपवर डीपी ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा. जेणेकरून कुणीही आपला प्राेफाईल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

सोशल मीडियावर बदनामी; ८ जणांवर गुन्हे - सायबर सेलकडे जिल्ह्यातील आठ ते दहा तक्रारींचा समावेश असून पोलिसांनी त्यांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कांबळे हे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर वॉच ठेवून आहेत. 

भावनांवर घालावा आवर - सामाजिक माध्यमांवर व्यक्त होण्यापूर्वी  आपण करतोय ते योग्य आहे का, याची खातरजमा करूनच खरं व्यक्त झाले पाहिजे. आपल्या एखाद्या पोस्टमुळे वादंग होणार असेल तर अशा प्रकारे व्यक्त न झालेलेच योग्य राहील. भावनांना आवर घातला पाहिजे. राजकीय चिखलफेकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी न होणे केव्हाही चांगले.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक