शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

188 किमीच्या सात दर्जोन्नत रस्त्यांना मिळाली नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 5:00 AM

या रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार होत प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष दुरूस्तीच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तब्बल सात ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून नवी ओळख देण्यात आली आहे. यात हिंगणघाट तालुक्यातील सहा तर देवळी तालुक्यातील एका रस्त्याचा समावेश असून या सातही दर्जोन्नत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासनाकडे अर्थसंकल्पीय प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला शासनाने हिरवी झेंडी दिली असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत हे मार्ग लवकरच गुळगुळीत होणार आहेत.हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ-सेलू-नरसाळा-काजळसरा हा २०.६०० किमीचा मार्ग, चिंचोली वाघोली-इंझाळा-पिंपळगाव-येरणवाडी- आर्वी- वडनेर- टेंभा- दोंदुर्डा- शेकापूर (बाई)- सेलू- कोल्ही ढिवरी-पिपरी सावंगी-येरला हा ६५ किमीचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ७ ते पोहणा-सास्ती-ढिवरी-पिपरी-खेकडी-धानोरा ते प्रमुख जिल्हा मार्ग २३ ला मिळणारा १५ किमीचा मार्ग, पिंपळगाव-उमरी मुरपाड-सेलू-काजळसरा हा १५ किमीचा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग २३ ते खापरी पिपरी-जांगोणा-वेणी-सास्ती हा २३ किमीचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ३२९ ते कांचणगाव-येरणगाव-मानकापूर-फुकटा-भिवापूर हा १३ किमीचा मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ३२९ ते नांदगाव-चिंचोली-पारडी-टेंभा हा १६.४०० किमीचा मार्ग तसेच देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ३६१ ते शिरपूर (खर्डा)-बोपापूर(वाणी)-अंदोरी-घोडेगाव-कोळोणा ते राष्ट्रीय महामार्ग ३३४ ला जोडणारा २० किमीचा मार्ग दर्जोन्नत झाल्याने जिल्हा परिषदेकडून हे सातही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले आहेत.इतकेच नव्हे तर या रस्त्यांना आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला असून या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार होत प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष दुरूस्तीच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दहा कोटींचा निधी होणार खर्चn या सात दर्जोन्नत रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षीत धरला जात आहे. असे असले तरी अजूनही या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नसून लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध होईल अशी आशा सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे.

निविदा प्रक्रियेचे काम युद्धपातळीवर- शासनाकडून मंजूरी मिळताच हे सातही दर्जोन्नत रस्ते लवकरात लवकर कसे गुळगुळीत होईल यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी कामाला लागले असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.

सदर दर्जोन्नत सात रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. निधी अजून मिळाला नसला तरी तो लवकरच शासनाकडून मिळेल. सध्या निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.- प्रकाश बुब, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग, वर्धा

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग