शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वीजतारेच्या स्पर्शाने सात म्हशी ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:50 IST

शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाडी शिवारात घडली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देवादळवाऱ्यामुळे तुटल्या तारा : शेतकऱ्यांचे आठ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाडी शिवारात घडली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस व महावितरणच्या अभियंत्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.आष्टी तालुक्यात मंगळवारच्या रात्री वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. या वादळात विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्या व तशाच प्रवाहित राहिल्या. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बांबर्डा येथील शेतकरी अंबादास चंदिवाले यांच्या तीन म्हशी, पिराजी चंदिवाले यांच्या दोन, शिवाजी चंदिवाले यांच्या दोन व नामदेव चंदिवाले यांची १ अशा आठ म्हशी वाडी शिवारातील मनाबाई चामलाटे यांच्या शेताजवळील पडिक भागात चरण्यासाठी गेल्या होत्या. चरत असताना वादळामुळे तुटून पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका पोठोपाठ सात म्हशी ठार झाल्या तर एक म्हैस दुर असल्याने ती विद्यूत स्पर्श होताच फेकल्या गेली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी माजी सरपंच नामदेव नायकुजी यांना दिली. त्यांनी पोलीस पाटील मोहित बगलेकर यांना कळविले. लागलीच पोलीस स्टेशन व महावितरणला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि महावितरणचे अभियंता अतकरी व लाईनमन सावरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यात शेतकऱ्यांचे आठ लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.महावितरणचा प्रताप चव्हाट्यावरग्राहकांकडून महावितरण मोठ्या प्रमाणात देयक वसुल करीत असतानाही सेवा देण्यात कुचराई करत असल्याचे असंख्य प्रकारावरुन सिद्ध झाले आहे. आताही विद्युत तारा तुटल्याने म्हशींना जीवंत ताराचा स्पर्श होताच त्या मृत्यूमुखी पडला. स्पर्श होताच वीजपुरवठा फ्युज जाऊन बंद का झाली नाही. याची पाहणी करण्याकरिता नागरिक व शेतकरी डीपीकडे गेले असता फ्युज ताराऐवजी जाड तार वारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रीप काढेपर्यंत विद्युत प्रवाह कायम होता. महावितरणच्या याच भोंगळ कारभारामुळे विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने मृत्यूच्या घटना वाढत असल्याचा आरोप गावकºयांनी केला असून याप्रकरणी महावितरण विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी