शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

वीजतारेच्या स्पर्शाने सात म्हशी ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:50 IST

शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाडी शिवारात घडली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देवादळवाऱ्यामुळे तुटल्या तारा : शेतकऱ्यांचे आठ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतात चरायला गेलेल्या म्हशींना तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्यामुळे ७ म्हशी जागीच ठार झाल्या तर एक गंभीर आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाडी शिवारात घडली. यात शेतकऱ्यांचे ८ लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस व महावितरणच्या अभियंत्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.आष्टी तालुक्यात मंगळवारच्या रात्री वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. या वादळात विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्या व तशाच प्रवाहित राहिल्या. बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास बांबर्डा येथील शेतकरी अंबादास चंदिवाले यांच्या तीन म्हशी, पिराजी चंदिवाले यांच्या दोन, शिवाजी चंदिवाले यांच्या दोन व नामदेव चंदिवाले यांची १ अशा आठ म्हशी वाडी शिवारातील मनाबाई चामलाटे यांच्या शेताजवळील पडिक भागात चरण्यासाठी गेल्या होत्या. चरत असताना वादळामुळे तुटून पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका पोठोपाठ सात म्हशी ठार झाल्या तर एक म्हैस दुर असल्याने ती विद्यूत स्पर्श होताच फेकल्या गेली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी माजी सरपंच नामदेव नायकुजी यांना दिली. त्यांनी पोलीस पाटील मोहित बगलेकर यांना कळविले. लागलीच पोलीस स्टेशन व महावितरणला माहिती दिल्यानंतर पोलीस आणि महावितरणचे अभियंता अतकरी व लाईनमन सावरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यात शेतकऱ्यांचे आठ लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.महावितरणचा प्रताप चव्हाट्यावरग्राहकांकडून महावितरण मोठ्या प्रमाणात देयक वसुल करीत असतानाही सेवा देण्यात कुचराई करत असल्याचे असंख्य प्रकारावरुन सिद्ध झाले आहे. आताही विद्युत तारा तुटल्याने म्हशींना जीवंत ताराचा स्पर्श होताच त्या मृत्यूमुखी पडला. स्पर्श होताच वीजपुरवठा फ्युज जाऊन बंद का झाली नाही. याची पाहणी करण्याकरिता नागरिक व शेतकरी डीपीकडे गेले असता फ्युज ताराऐवजी जाड तार वारल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रीप काढेपर्यंत विद्युत प्रवाह कायम होता. महावितरणच्या याच भोंगळ कारभारामुळे विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने मृत्यूच्या घटना वाढत असल्याचा आरोप गावकºयांनी केला असून याप्रकरणी महावितरण विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी