पीक कर्जासाठी ११०० कोटींचे ध्येय ठरवा

By Admin | Updated: May 1, 2016 02:05 IST2016-05-01T02:05:04+5:302016-05-01T02:05:04+5:30

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, ....

Set target of 1100 crores for crop loan | पीक कर्जासाठी ११०० कोटींचे ध्येय ठरवा

पीक कर्जासाठी ११०० कोटींचे ध्येय ठरवा

किशोर तिवारी : शेतकऱ्यांना सातबारा व आठ-अ घरपोच मिळणार
वर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ८० टक्के कर्ज ३१ मे पूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ आदी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील. शेतकऱ्यांना अकराशे कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
विकास भवन येथे शनिवारी राष्ट्रीयकृत व खासगी बँकेच्या १३८ बँक व्यवस्थापक, तालुकास्तरावरील महसूल, कृषी, सहकार आदींच्या अधिकाऱ्यांची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपासंदर्भात बैठक पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. समीर कुणावार, प्रभारी जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रशांत इंगळे तिगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, नाबार्डच्या स्रेहल बन्सोड यांची उपास्थिती होती.
खरीप हंगामासाठी गत वर्षी केवळ ४० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले होते; परंतु यावर्षी ८० टक्के शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करताना किशोर तिवारी यांनी यावेळी केली. यावेळी ते म्हणाले, शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी ३१ मे पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांला कर्ज पुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी.
शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू, शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, असेही यावेळी तिवारी यांनी सांगितले.

१.९६ शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करण्याच्या सूचना
वर्धा जिल्ह्यासाठी ७०० कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. परंतु १ लाख ९६ हजार शेतकऱ्याना पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे. याकरिता जिल्ह्याने १ हजार १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. याकरिता तहसीलदारांकडून गावनिहाय शेतकऱ्यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा व आठ अ हा नमुना बँकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Web Title: Set target of 1100 crores for crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.