शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सोयाबीनच्या ३२९ तक्रारींत बियाणे सदोष; कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:02 IST

शेतकऱ्यांना ४.८५ लाखांची नुकसान भरपाई

वर्धा : खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत प्राप्त ५३० तक्रारीपैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष असल्याचे आढळून आल्यामुळे ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या इंदोर येथील कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ११७ शेतकºयांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून  ४ लाख ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई म्हणून कंपनीने अदा केल्याची माहिती जि.प. कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाण्यांच्या ५३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने प्राप्त तक्रारीची तपासणी करुन पंचनामे केले. त्यापैकी एकूण ३२९ तक्रारींमध्ये  तालुकास्तरीय समीतीच्या तपासणीत बियाणे सदोष आढळुन आले.  त्याअनुषंगाने बियाणे सदोष असल्यामुळे ईगल सिड्स प्रा. लि. इंदोर या कंपनीवर हिंगणघाट कृषी अधिकारी यांनी ३ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. शिवाय फौजदारी कार्यवाही सध्या सुरु आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गुणनियंत्रण निरिक्षकामार्फत खरीप हंगामामध्ये आतापर्यंत बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व किटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळेस आढळुन आलेल्या त्रुटीच्या अनुषगाने बियाणे ४७, रासायनिक खते १७, व किटकनाशक ६  अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश देण्यात आला. तसेच शासनामार्फत जि.प. कृषी विभागाला अप्रमाणित बियाणे २७०, कीटकनाशके ४९ व रासायनिक खतांचे १९२ नमुने घेण्याचा लक्षांक देण्यात आला होता. त्याअनुषंगाने आतापर्यंत बियाणे-१६९, रासायनिक खते-१२२ व किटकनाशक १८ नमुने घेवुन विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे.

विश्लेषणाचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये बियाणे-१० नमुने, रासायनिक खते-७ नमुने अप्रमाणीत घोषित झाले. याबाबत ६ कंपनी व ६ कृषी केंद्रांवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच पंचायत समिती सेलु अंतर्गत केळझर येथे बोगस बिटी बियाणे सापडल्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी संबधीतावर २० जूनला गुन्हा दाखल  केला आहे. कृषी विभाग व जिल्हा परिषदच्या भरारी पथकाने बोगस खत, बियाणे सापडल्याने संयुक्त कार्यवाही करुन २१ जूनला  संबधीतावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार