शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कोरोनाबाधित क्षेत्रातून सीमोल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

तालुक्यातील उबदा येथिल एक मुलगी दीड महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील देवगाव येथे मामाकडे गेली होती. तिचा विवाह ठरला होता पण, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. मात्र, २८ एप्रिलला तिच्या मामाने एका खासगी वाहनातून पुलगावपर्यंत आणून दिले. तिथून तिच्या वडिलांनी कोणतीही परवानगी न घेता एम.एच.३१ सी.एस. ४७०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून रात्री दोन वाजता मुलीला आपल्या गावी आणले.

ठळक मुद्देसात जणांवर गुन्हा दाखल : यवतमाळ जिल्ह्यातून मुलीला घेऊन गाठले उबदा गाव

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : वर्धा जिल्हा ग्रीनझोमध्ये असून या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. सर्व सीमाही बंद करण्यात आल्या असतानाही यवतमाळ या कोरोनाबाधित जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने मुलीला उबदा या गावी आणले. यामुळे प्रशासनाकडून मुलीसह तिचे वडील व इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुलीला सेवाग्राम येथील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले तर इतरांना घरीच क्वारंटाईन केले आहे.तालुक्यातील उबदा येथिल एक मुलगी दीड महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील देवगाव येथे मामाकडे गेली होती. तिचा विवाह ठरला होता पण, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. मात्र, २८ एप्रिलला तिच्या मामाने एका खासगी वाहनातून पुलगावपर्यंत आणून दिले. तिथून तिच्या वडिलांनी कोणतीही परवानगी न घेता एम.एच.३१ सी.एस. ४७०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून रात्री दोन वाजता मुलीला आपल्या गावी आणले. यावेळी मुलीला सदी, ताप व खोकला, असे लक्षण दिसून आल्याने ग्रामपंचायत सचिवांनी याची माहितीतालुका प्रशासन व पोलिसांना दिली. त्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार समुद्रपूर पोलिसांनी मुलीसह तिचे वडील, मामा, चुलत सासरे, वाहन चालक, मालकासह आणखी एक, अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला सेवाग्राम रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. तिचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सहा जणांना आपापल्या घरात क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाबाधित यवतमाळ जिल्ह्यातून ही मुलगी आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दिल्लीतून दोघे आले समुद्रपुरातसीमाबंदीनंतरही नागरिक खासगी वाहनाने किंवा रुग्णवाहिकेच्या सहाय्याने आपले गाव गाठतांना दिसून येत आहे. कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाºया या व्यक्तींमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असून गावकऱ्यांमध्येही दहशत निर्माण होत आहे. दिल्ली येथून एका परिसरातील मुलगा व सून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने समुद्रपुरात दाखल झाले. त्यामुळे या दोघांनाही वर्ध्याला पाठवून क्वारंटाईन करण्यात आले तर त्यांच्या परिवारातील सदस्यांना घरीच क्वारंटाईन केले आहे. या सर्व परिस्थितीवर तहसीलदार राजू रणवीर, नगराध्यक्ष गजानन राऊत, मुख्याधिकारी स्वलिया मालगवे, नायब तहसीलदार के.डी.किरसान, महेंद्र सुर्यवंशी, हेमंत तायडे, ठाणेदार हेमंत चांदेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील भगत लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या