शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

चरखागृहात उभारले जाणार बापू, विनोबांचे शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:00 AM

चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून वाहतूक : नऊ महिने तज्ज्ञ, विद्यार्थ्यांनी घेतले परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जागतिकस्तरावर आजपर्यंत भंगारातून शिल्प तयार केल्या गेलेले नाही. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे पहिलेच आणि सर्वात मोठे वैशिष्टयपूर्ण शिल्प असून याची स्थापना अण्णासागर तलावाजवळ जवळ न करता ते चरखागृह परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती तज्ज्ञ समितीतील सर जे.जे.स्कूल ऑफ आटर््सचे प्रा.विजय बोंदर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रा.बोंदर यांनी सुरूवातीला अण्णा सागर ही जागा दोन्ही शिल्प उभारण्यासाठी निवडली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ती जागा रद्द करून चरखागृहाची जागा निश्चित करण्यात आली. सेवाग्राम-वर्धा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. रस्त्याच्या दिशेने शिल्प उभारण्यात येणार असल्याने ये- जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे. याच ठिकाणी जागतिक दर्जाचा चरखा आहे. चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे. जवळपास नऊ महिने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून शिल्प तयार केले आहे.यासाठी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मे. अडारकर असोसिएट मुंबई, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे निर्मिती विभाग, तज्ज्ञ समितीचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे, असे सांगितले. यावेळी अधिव्याख्याता विजय सकपाळ यांनी नीलपंख या पक्षाच्या निर्मितीविषयी माहिती दिली.दोन्ही महामानवांचे जीवन व कार्य राष्ट्र आणि मानवतेसाठी राहिले आहेत. दोघांचेही विचार मूल्य आजही जगाच्या कल्याणासाठी असल्याचे जगाने मान्य केले आहे. सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत चरखागृह आणि शिल्पाचे काम करण्यात येत असून वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.भंगार साहित्यातून शिल्पनिर्मितीबा-बापू यांचे १५० वी जयंती वर्ष आहे. सेवाग्राम-वर्धा बापूंची कर्मभूमी, प्रयोगभूमी असल्याने त्यांच्या विचार व कार्याच्या स्मृती जोपासण्यात याव्या, जागतिक दर्जाचे वैशिष्टयपूर्ण कार्य स्मारकाच्या माध्यमातून व्हावे या दृष्टिकोनातून चरखागृह, मेटल स्कॅ्रपमधून शिल्प निर्माण करण्यात आले आहे.

टॅग्स :Vinoba Bhaveविनोबा भावेMahatma Gandhiमहात्मा गांधी