शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शालेय परिवहन समिती आता होतेय आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:01 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन होणे क्रमप्राप्त आहे; पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही समितीच नसल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देसोलापूरनंतर वर्धेत प्रयोग : उपप्रादेशिक परिवहनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन होणे क्रमप्राप्त आहे; पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही समितीच नसल्याचे बोलले जाते. प्रत्येक शाळेत सदर समिती स्थापन व्हावी आणि समिती सदस्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नेतृत्त्वात सध्या विशेष उपक्रम राबविल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केले जात असून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शालेय परिवहन समिती आॅनलाईन केल्या जात आहेत.उल्लेखनिय म्हणजे यापूर्वी सोलापूरात या यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. त्याच पाश्वभूमिवर वर्धेत हा प्रयोग केला जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाल्याकडे काही प्रमाणात पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बहूतांश शाळांमध्ये स्कूल व्हॅन आहेत. परंतु, काही स्कूल व्हॅन मध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाहिजे त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने केलेल्या काही कारवाईत पुढेही आले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून सोलापूर नंतर वर्धेत हा उपक्रम राबविण्याचा मानस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांचा आहे. प्रत्येक शाळांमधील शालेय परिवहन समिती आॅनलाईन करण्यासाठी सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.जिल्ह्यात १ हजार ५१९ शाळाजिल्ह्यात १ हजार १७३ प्राथमिक तर ३४६ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमधील शालेय परिवहन समितीची माहिती यापुढे एका क्लिकवर मिळणार आहे. या सर्व शाळांनी आपल्याकडील शालेय परिवहन समितीची माहिती व इतर आवश्यक माहिती आॅनलाईन पद्धतीचा वापर करून वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विशेष वेबसाईट अपलोड करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सांभाळणार जबाबदारीकमीत कमी सहा सदस्य असलेल्या या शालेय परिवहन समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी शासन निर्देशाप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहणार आहे. या समितीत शाळेच्या मुख्याध्यापकांसह प्रतिनिधी म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक, पोलीस विभागातील एक अधिकारी, पालक प्रतिनिधी आदींचा समावेश असणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.शंभरहून अधिक शाळांनी आॅनलाईन माहिती भरलीवर्धा जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा एकूण १ हजार ५१९ शाळा असून सध्यास्थितीत शंभराहून अधीक शाळांनी त्यांच्या येथे असलेल्या शालेय परिवहन समितीची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वेबसाईटवर भरली असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित शाळांनीही ही माहिती भरावी यासाठी शिक्षणाधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे. पण, त्यांच्याकडून कासवगतीनेच कार्य होत असल्याचे बोलले जात आहे.