शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३२ लाखांचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:31 IST

संचालक गजानन निकम यांचा आरोप : पत्रकार परिषदेतून दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने तोलाईमध्ये अंदाजे ३२ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. यामुळे समितीचे कोटी रुपयांच्या बाजार शुल्काचे नुकसान झाले आहे. तसेच बाजार समिती, कास्तकारी खरेदी विक्री संस्था, शेतकरी जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन निकम यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेतून केला.

आर्वीच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामभाऊ कुमटे, जनार्दन जगताप, प्रभाकर टोपले, मधुकर सोमकुवर, मनीष उभाड, रणजित देशमुख, हर्षराज जगताप, नाना राठोड, जया देवकर, सचिन वैद्य, तुळशीराम सोमकुवर, अविनाश बोबडे आदींची उपस्थिती होती. समितीचे सभापती कापूस व्यापाऱ्यांना १०० टक्क्यांपैकी फक्त ३० टक्के बाजार शुल्क आकारून ७० टक्के सूट देऊन व्यापाऱ्यांपासून रोखीने आर्थिक लाभ मिळवित असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यामुळे ८ एप्रिलला संचालक या नात्याने स्वतः कापूस जिनिंगमध्ये तपासणी केली असता, समितीच्या रेकॉर्डवर कापूस खरेदी कमी दाखवित असून, व्यापाऱ्यांना सूट देत आहे. अशा प्रकारातून केवळ तोलाई शुल्कात अंदाजे ३२ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. सभापतींचे विश्वासपात्र कर्मचारी सहसचिव विशाल येलेकर व हंगामी कर्मचारी सिद्धार्थ कांबळे हे गैरव्यवहार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या गैरव्यवहारमुळे समिती क्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समिती हिशोब पट्टी मिळत नाही. स्वतः मुख्य प्रवर्तक असलेल्या सूतगिरणीला पदाचा गैरवापर करून बाजार समिती, आर्वीकडून ३५ लाख रुपये गुंतवून आर्थिक लाभ मिळविण्याचा हेतू असल्याचेही संचालक निकम म्हणाले.

संस्थेची जागा भाड्याने देऊन केलाय भूखंड घोटाळानझूलद्वारे भाडेतत्त्वावर मिळालेली जागा स्वमालकीची समजून जुनी इमारत जमीनदोस्त करून व्यापारी हिताचे दुकाने अथवा बांधकाम करण्याचे नियोजित केले आहे. त्या बांधकामाकरिता त्यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून रक्कम गोळा केलेली आहे. नझूलच्या जागेवर स्वतः पदाधिकारी असलेल्या कृषक शिक्षण संस्था, आर्वी नागरी सहकारी पतसंस्था तसेच इतर व्यावसायिकांना नियमबाह्य पोटभाडेकरू कसे ठेवले? असा प्रश्न निकम यांनी उपस्थित करून संस्था स्वतःच्या मालकीची समजून दीर्घ मुदतीकरिता जागा भाड्याने देण्यात येतात व त्यातून आर्थिक लाभ मिळवून भूखंड घोटाळाही केल्याचे म्हटले आहे.

कर्मचारी भरतीतसह भाड्यातही गडबडशेतकरी जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड, आर्वी येथे भूखंड घोटाळा करून अटी पूर्ण न करता दीर्घ मुदतीवर जागा भाड्याने देण्यात येतात. भाडेधारकाकडून प्रत्यक्ष भाडे संस्थेस व अप्रत्यक्ष भाडे रोखीने वसूल केल्या जाते. याची चौकशी होणे आवश्यक आहे. कर्मचारी वाटेल तेव्हा काढून टाकले जातात, त्यांना अंतिम लाभ दिल्या जात नाही. तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया न राबविता स्वतःच्या नातेवाइकांना व्यवस्थापकपदी नियुक्त करून दोन्ही संस्थेतून पगार देत असल्याचे सांगितले.

"आर्वी तहसील सहकारी कास्तकारी खरेदी विक्री संस्था, जिनिंग प्रेसिंग आर्वी, कृषी उत्पन्न बाजार समिती या माझ्याशी संबंधित असणाऱ्या तिन्ही संस्थांमध्ये गैरप्रकार किंवा कुठलीही अनियमितता नाही. सुतगिरणीचे जमा करीत असलेले भागभांडवल नियमांच्या अधिन राहूनच आहे. संस्थेवर व माझ्यावर हे आरोप राजकीय हेतुने प्रेरीत होऊन आकसापोटी केले जात आहे. मी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे या आरोपांसदर्भात सविस्तर खुलासा करु शकत नाही. पण, १५ एप्रिलनंतर आर्वीत परतल्यावर केलेल्या आरोपाबाबत सर्व माहिती देऊन या आरोपावर उत्तर दिले जाईल."- संदीप काळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.

"प्रभारी सचिवांनी माझ्‌याकडे शेतमाल आवक व्यवस्थापनाचे काम सोपवले आहे. बाजार समितीने विक्रमी सव्वा दोन लाख क्विंटल धान्याची आवक स्वीकारली. तसेच कापसाचीही अधिक आवक झाली आहे. बाजार समितीचे उत्पन्न लाखांतून कोटीमध्ये पोहोचले आहे. जर गैरव्यवहार झाला असता तर बाजार समितीचे उत्पन्न वाढले असते का? संचालक मंडळाच्या वैचारिक मतभेदातून हे आरोप होत असल्याचा अंदाज आहे."- विशाल येलेकर, सहसचिव, कृ.उ.बा.स

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा