शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याचे सावट

By admin | Updated: April 19, 2015 02:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले.

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले. या पावसाचा फटका बसल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा कमी झाला. परिणाती उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या बियाण्यावर होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. येत्या खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीनचे बियाने जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयाबीन हे स्वपरासिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना वापरता येवू शकतात. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल. बियाणे साठवताना बियाणाच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक आहे. या बियाण्यांना इजा झाल्यास त्याचा परिणात उगवण क्षमतेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सात फुटांपेक्षा जास्त नसावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविले आहे. शेतकऱ्यांनी स्वत: कडील बियाणे वापरण्यासाठी या उपायांचा अवलंब करावा, असे पुण्याच्या कृषी आयुक्तांनी कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्याने अडचण जात आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या घरचे सोयाबीन बाजारात बियाण्यांची कमतरता जाणवण्याचे भाकीत कृषी विभागागाच्यावतीने करण्यात आले आहे. वास्तविकतेत आजच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन नाही. त्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. यामुळे त्यांची पंचायईत होणार असल्याचे चित्र आहे.कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेले भाकित बियाणे विक्रेत्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. बियाण्यांची कमतरता असण्याचे चित्र निर्माण झाल्याने त्यांच्याकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करण्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.