शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याचे सावट

By admin | Updated: April 19, 2015 02:00 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले.

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले. या पावसाचा फटका बसल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा कमी झाला. परिणाती उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या बियाण्यावर होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. येत्या खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीनचे बियाने जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयाबीन हे स्वपरासिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना वापरता येवू शकतात. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल. बियाणे साठवताना बियाणाच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक आहे. या बियाण्यांना इजा झाल्यास त्याचा परिणात उगवण क्षमतेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सात फुटांपेक्षा जास्त नसावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविले आहे. शेतकऱ्यांनी स्वत: कडील बियाणे वापरण्यासाठी या उपायांचा अवलंब करावा, असे पुण्याच्या कृषी आयुक्तांनी कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्याने अडचण जात आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या घरचे सोयाबीन बाजारात बियाण्यांची कमतरता जाणवण्याचे भाकीत कृषी विभागागाच्यावतीने करण्यात आले आहे. वास्तविकतेत आजच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन नाही. त्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. यामुळे त्यांची पंचायईत होणार असल्याचे चित्र आहे.कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेले भाकित बियाणे विक्रेत्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. बियाण्यांची कमतरता असण्याचे चित्र निर्माण झाल्याने त्यांच्याकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करण्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.