तुरीच्या चुकार्‍यासाठी सत्याग्रह

By Admin | Updated: May 24, 2014 00:08 IST2014-05-24T00:08:49+5:302014-05-24T00:08:49+5:30

मागील अडीच महिन्यांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत नाफेडच्या अंतर्गत खरेदी केलेलया तूरीचे चुकारे अजूनही शेतकर्‍यांना दिले नाही़ किसान अधिकार अभियानने दोन महिन्यात

Satyagraha for the poem | तुरीच्या चुकार्‍यासाठी सत्याग्रह

तुरीच्या चुकार्‍यासाठी सत्याग्रह

चण्याचे ४ कोटी ८१ हजार तर तुरीचे ५७ लाख रुपयांचे चुकारे थकले

वर्धा : मागील अडीच महिन्यांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत नाफेडच्या अंतर्गत खरेदी केलेलया तूरीचे चुकारे अजूनही शेतकर्‍यांना दिले नाही़ किसान अधिकार अभियानने दोन महिन्यात यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हाधिकारी व राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याशी शेतकर्‍यांच्या प्रश्नाची चर्चा केली़ मात्र उपयोग न झाल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात किसान अधिकार अभियानच्यावतीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. या प्रश्नाला निकाल लावून शेतकर्‍यांना तूरीच्या चुकार्‍याचे धानेदश प्राप्त होईपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्याची भूमिका किसान अधिकार अभियानने घेतली आहे़ वर्धा जिल्ह्यातील चणा खरेदीचे ४ कोटी ८१ लक्ष रूपये व तुरीचे ५७ लक्ष रूपये अजून शेतकर्‍यांना मिळालेले नाही. सेलू तालुक्यात ६ मार्च २०१४ पासून खरेदी झालेल्या ६ लक्ष ४५ हजार रूपयांच्या तुरीच्या खरेदीचे कोणतेही चुकारे मागील अडीच महिन्यात झाले नाही़ नाफेडने पैसे पाठविले नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख बिलाल सांगतात़ जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात पुढाकार घेवून प्रश्न तात्काळ सोडवावा म्हणून निवेदन दिले होते़ जोपर्यंत प्रश्न सुटत नाही सत्याग्रह सुरू ठेवण्याचा निर्धार किसान अधिकार अभियानने केला आहे. या आंदोलनात मुख्यप्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, सेलू तालुकाध्यक्ष विठ्ठलराव झाडे, जगदिश चरडे, आशिष राऊत, गोविंदा पेटकर, ज्ञानेश्वर उमाटे, प्रमोद फुलझेले, पद्माकर कुत्तरमारे, हेमराज हिवरे, गजानन पाहुणे, निवृत्ती तडस, गजानन नेहारे आदींचा सहभाग आहे़(जिल्हा प्रतिनिधी) शेतकर्‍यांच्या चकरा वर्धा जिल्ह्यातील चणा खरेदीचे ४ कोटी ८१ लक्ष रूपये व तुरीचे ५७ लक्ष रूपये अजून शेतकर्‍यांना मिळालेले नाही. सेलू तालुक्यात ६ मार्च २०१४ पासून खरेदी झालेल्या ६ लक्ष ४५ हजार रूपयांच्या तुरीच्या खरेदीचे कोणतेही चुकारे मागील अडीच महिन्यात झाले नाही़ नाफेडने पैसे पाठविले नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख बिलाल सांगतात़ शेतकरी चुकार्‍यासाठी वारंवार चकरा मारत आहे. मात्र अधिकारी हे चुकारे मिळूवन देण्यास हतबल असल्याचे दाखवत असल्याचे एकूण चित्र आहे.

Web Title: Satyagraha for the poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.