शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

वर्धा जिल्ह्यतील ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय विकासाच्या प्रवाहातून लांबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:35 IST

वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे.

ठळक मुद्देगिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदपर्यटन विकासाचे घोडे अडलेय कुठे, नागरिकांचा प्रश्न

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ब्रिटिशांनी दूरदृष्टी ठेवूनच विकासकामे केली होती. त्यांनी बांधलेले पूल, इमारती आणि जलाशय आजही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंग्रजांनी १९१७ मध्ये अभ्यास करून आर्वीमध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती केली. त्या काळामध्ये या जलाशयाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. या जलाशयाचा पर्यटनासाठी विकास करण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी असतानाही घोडे अडेलय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्वीकरांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी ब्रिटिश राजवटीत १९१७ मध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. तब्बल ८५ वर्षे हा जलाशय आर्वीकरांसाठी जीवनदायिनी ठरला होता. इंग्रजांच्या राजवटीत या तलावाचे पाणी कोणतेही यंत्र न वापरता सरळ तिसऱ्या माळ्यावर पोहोचत होते. याचीच दखल घेऊन या जलाशयाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. आर्वीची वाढती लोकसंख्या तसेच जलाशयातील गाळ न उपसल्याने येथील पाणीपुरवठा अपुरा ठरत होता. त्यामुळे नगरपालिकेने ही नळयोजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला हस्तांतरित केली. आता पंधरा ते वीस वर्षांपासून जीवन प्राधिकरणच्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या जलाशयाकडे प्रशासनासह शासनाचे दुर्लक्ष असल्याने या जलाशयाची दुर्दशा झाली आहे.

आर्वीकरांसाठी हा ऐतिहासिक ठेवा कायम राहावा म्हणून हे पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक यांच्या सहकार्याने शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बांधकाम विभागाने काही बांधकामही केले. मात्र, अनेक महिन्यांपासून काम थंडबस्त्यात पडले असून जलाशयाची दुरवस्था झाली आहे. या जलाशयावर जाण्यासाठी इंग्रजांनी दगडाच्या पायऱ्या केल्या होत्या, त्याही दिसेनाशा झाल्या आहेत. भिंतीही कमजोर झाल्या असून त्याला तारांच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून झाडे-झुडपेही वाढली आहेत. या परिसरात जवळपास दीडशे एकरमध्ये सागाची झाडे असून ही जमीन नगरपालिकेच्या मालकीची आहे. याकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने हे पर्यटनस्थळ केव्हा होणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे.आर्वी नगरपालिकेने सारंगपुरी जलाशय पर्यटनस्थळ व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव शासनाने मंजूर केला, शासनाचा तो निधी बांधकाम विभागाला हस्तांतरित केला. त्याचे कामही सुरू आहे. मात्र, आता जलदगतीने आणि चांगले काम करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. आराखड्याप्रमाणे ते काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करून बांधकाम विभाग नगरपालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. त्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपालिकेकडे राहील.- प्रा. प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष, आर्वी

टॅग्स :Waterपाणी