शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यतील ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय विकासाच्या प्रवाहातून लांबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:35 IST

वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे.

ठळक मुद्देगिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदपर्यटन विकासाचे घोडे अडलेय कुठे, नागरिकांचा प्रश्न

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ब्रिटिशांनी दूरदृष्टी ठेवूनच विकासकामे केली होती. त्यांनी बांधलेले पूल, इमारती आणि जलाशय आजही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंग्रजांनी १९१७ मध्ये अभ्यास करून आर्वीमध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती केली. त्या काळामध्ये या जलाशयाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. या जलाशयाचा पर्यटनासाठी विकास करण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी असतानाही घोडे अडेलय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्वीकरांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी ब्रिटिश राजवटीत १९१७ मध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. तब्बल ८५ वर्षे हा जलाशय आर्वीकरांसाठी जीवनदायिनी ठरला होता. इंग्रजांच्या राजवटीत या तलावाचे पाणी कोणतेही यंत्र न वापरता सरळ तिसऱ्या माळ्यावर पोहोचत होते. याचीच दखल घेऊन या जलाशयाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. आर्वीची वाढती लोकसंख्या तसेच जलाशयातील गाळ न उपसल्याने येथील पाणीपुरवठा अपुरा ठरत होता. त्यामुळे नगरपालिकेने ही नळयोजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला हस्तांतरित केली. आता पंधरा ते वीस वर्षांपासून जीवन प्राधिकरणच्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या जलाशयाकडे प्रशासनासह शासनाचे दुर्लक्ष असल्याने या जलाशयाची दुर्दशा झाली आहे.

आर्वीकरांसाठी हा ऐतिहासिक ठेवा कायम राहावा म्हणून हे पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक यांच्या सहकार्याने शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बांधकाम विभागाने काही बांधकामही केले. मात्र, अनेक महिन्यांपासून काम थंडबस्त्यात पडले असून जलाशयाची दुरवस्था झाली आहे. या जलाशयावर जाण्यासाठी इंग्रजांनी दगडाच्या पायऱ्या केल्या होत्या, त्याही दिसेनाशा झाल्या आहेत. भिंतीही कमजोर झाल्या असून त्याला तारांच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून झाडे-झुडपेही वाढली आहेत. या परिसरात जवळपास दीडशे एकरमध्ये सागाची झाडे असून ही जमीन नगरपालिकेच्या मालकीची आहे. याकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने हे पर्यटनस्थळ केव्हा होणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे.आर्वी नगरपालिकेने सारंगपुरी जलाशय पर्यटनस्थळ व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव शासनाने मंजूर केला, शासनाचा तो निधी बांधकाम विभागाला हस्तांतरित केला. त्याचे कामही सुरू आहे. मात्र, आता जलदगतीने आणि चांगले काम करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. आराखड्याप्रमाणे ते काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करून बांधकाम विभाग नगरपालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. त्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपालिकेकडे राहील.- प्रा. प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष, आर्वी

टॅग्स :Waterपाणी