शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

मोफतच्या तांदळाची लाभार्थ्यांकडून विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्या गेल्याने शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रतीव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास १० लाख ७३ हजार १९२ व्यक्तींना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभ मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्यांपासून मोफतचा तांदूळ मिळत असल्याने तो साठविण्यासही अडचणी येत आहे.

ठळक मुद्देशासकीय योजनेला सुरुंग : तांदूळ द्या अन् ज्वारी घ्या, हिंदनगर परिसरातून मालवाहू केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून गरीबाला मिळणारे स्वस्त धान्य, दुकानदारांकडून बाजारात विकल्या जात असल्याची आतापर्यंत ओरड होत आली आहे. पण, या कोरोनाकाळात शासनाकडून मोफत दिलेले तांदूळ थेट दहा रुपये किलोने लाभार्थ्यांकडूनच विकल्या जात असल्याचे चित्र गावोगावी पहावयास मिळत आहे. त्यामुळे पहिले दुकानदारांकडून तर आता खुद्द लाभार्थ्यांकडूनच शासनाच्या योजनेला हरताळ फासल्या जात असल्याने कारवाई कुणावर होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्या गेल्याने शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रतीव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास १० लाख ७३ हजार १९२ व्यक्तींना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभ मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्यांपासून मोफतचा तांदूळ मिळत असल्याने तो साठविण्यासही अडचणी येत आहे. त्यातुळे काही लाभार्थ्यांनी आता या मोफतच्या तांदळाची दहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री सुरु केली आहे. तर काहींनी शक्कल लढवून दोन किलो तांदळाच्या बदल्यात एक किलो ज्वारी देण्याचा फंडा शोधून काढला आहे. पवनार येथे चक्क ग्रामपंचायत सदस्याकडूनच मोफत तांदळाची विक्री होत असल्याचा फोटो व्हायरल झाला. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी धान्याच्या बदल्यात धान्य मिळत असेल तर त्यात गैर काय? असे सांगितले. असाच काहीसा प्रकार वर्ध्यालगतच्या सिंदी (मेघे) परिसरातील हिंदनगर शितला माता मंदिर जोशी ले-आऊटमध्ये रविवारी सुरु होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास एम. एच. ३२ जी. १६५२ क्रमांकच्या वाहनामागे ५० ते ६० लोकांची रांग लागली होती. ते तांदूळ देऊन वाहनचालकांकडून ज्वारी घेत होते.यावेळी सोशल डिस्टंस्निंगचा फज्जा उडाल्याचे लक्षात येताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या पथकाने हा प्रकार थांबवून वाहन ताब्यात घेत रामनगर पोलीस ठाण्यात लावले. तसेच वाहन मालक इस्त्राईल शेख मुन्सी व अमीत बजरंगदास सौदिया दोघेही रा. पुलगाव यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. नगरपालिकेचे पथक प्रमुख निखिल लोहवे, ज्ञानेश्वर परटक्के, गजनान पेटकर तर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी देशमुख यांनी ही कारवाई केली असून यासंदर्भात पोलिसांना लेखी तक्रारही दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध संचारबंदीच्या उल्लंघनाचे कारण पुढे करून गुन्हा नोंदविला आहे.फिल्टर करून तांदूळ दामदुप्पट दराने येतोय बाजारात?ऐरवी ग्रामीण भागात तांदूळासह धान्य विक्री करण्यासाठी वाहनाने येणारे लहान व्यापारी आता तांदूळाची खरेदी करायला येतांना दिसून येत आहे. गावागावमध्ये फिरुन दहा रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानातून मिळालेले तांदूळ ते खरेदी करीत आहे. ग्राहकांनाही ते तांदूळ मोफत मिळाल्याने तेही दहा रुपये दराने त्यांना विकत आहे. दहा रुपये दराने खरेदी केलेले तांदूळ फिल्टर करुन २५ ते ३० रुपये दराने बाजारपेठेत विक्रीस येत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे फिल्टरचे काम हे जिल्ह्यातच काही मोठे व्यावसायीक करीत असल्याने धान्यातील या नव्या काळ्याबाजाराच्या मुळाशी जाण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.दुकानदारही म्हणतो काहीही करा पण, तांदुळ न्या!शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना दरमहिन्याला धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर आहे.त्यांच्यावर प्रशासनाचाही वॉच असल्याने आणि बायोमॅट्रीक्स प्रणाली अनिवार्य केल्याने स्वस्त धान्य दुकानदारही आता लाभार्थ्यांना तांदळासह इतर धान्य घेऊन जाण्यास सांगत आहे. काहींकडून तांदूळ नेण्यास नकार दिला जात असला तरीही काहीही करा पण, तुमच्या वाट्याचे तांदूळ घेऊन जा, असा आग्रह धरत असल्याने लाभार्थीही ईच्छा नसताना मोफतचे तांदूळ आणून ते दहा रुपये दराने विकत आहे. त्यामुळे शासकीय धान्याचा होणारा हा गैरवापर तात्काळ थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना