शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

गावगाड्याचा लोकवाहिनीतून सुरक्षित प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देअर्थव्यवस्थेला चालना : बसस्थानकावर उपाययोजना, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची घेताहेत नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावगाड्याशी संपर्क साधून अर्थव्यवस्थेला चालना देणाºया लोकवाहिनीचे चाके गेल्या पाच महिन्यानंतर रुळावर यायला सुरुवात झाली आहे. शासनाने आंतरजिल्हा बसप्रवासाला विना ई-पास परिवानगी दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून लालपरी जिल्ह्याबाहेर जाऊन प्रवाशांना सेवा देण्यासोबतच झालेल्या नुकसानीलाही भरुन काढण्यासाठी आटापीटा करीत आहे. पण, मर्यादीत प्रवाशी संख्येच्या बेड्या असल्याने ‘आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया’ अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या २० ते २५ बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २२ प्रवाशांनाच विनापास प्रवास करण्याची मुभा असल्याने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, काटोल, मोर्शी, उमरेड, वरुड, राळेगाव आदी ठिकाणी बसप्रवास सुरु आहे. सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्यानुसार बसस्थानकावर बसचे निर्जतुकीकरण करणे, प्रवाशांची नोंद घेणे, बसस्थानकाची स्वच्छता करणे, हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करणे आदी उपाययोजना केल्या जो की नाही, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ च्या स्थानिक प्रतिनिधींनी थेट वर्धा, पुलगाव, हिंगणघाट व आर्वीचे बसस्थानक गाठले. तेव्हा काही ठिकाणी या सुविधांचा अभाव दिसून आला तर काही ठिकाणी सर्व सुविधा असूनही प्रवाशांकडून त्याचा उपयोग घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे.वर्धा स्वच्छता आहे पण,वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या ठिकाणी इतर जिल्ह्यातून येणाºया बसेसचे प्रमाण अधिक आहे. सोबतच येथून लगतच्या अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, उमरखेड, राळेगाव, वरुड, मोर्शी, राजूरा या ठिकाणी जाणाºया बसेसचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचीही संख्या मोठी असते. पण, शासनाने ठरवून दिल्यानुसार बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या आणि बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसचे निर्जतुकीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था दिसली नाही.निर्जंतुकीकरणाचा पत्ता नाहीतसेच बसस्थानकावर हात धुण्यासाठी कुठेही हॅण्डवॉश, सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. मात्र, बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांची वाहकांकडून नोंद घेतली जात होेती. बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना सोशल डिस्टंन्स ठेऊन बसविले जात होते. यावेळी नागपूरातून आलेल्या एका बसचालकाला विचारले असता नागपूरमध्ये बस सॅनिटाईझ झाली पण, वर्ध्यात तशी सुविधा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्धा आगारानेही प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटी