शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

गावगाड्याचा लोकवाहिनीतून सुरक्षित प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देअर्थव्यवस्थेला चालना : बसस्थानकावर उपाययोजना, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची घेताहेत नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावगाड्याशी संपर्क साधून अर्थव्यवस्थेला चालना देणाºया लोकवाहिनीचे चाके गेल्या पाच महिन्यानंतर रुळावर यायला सुरुवात झाली आहे. शासनाने आंतरजिल्हा बसप्रवासाला विना ई-पास परिवानगी दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून लालपरी जिल्ह्याबाहेर जाऊन प्रवाशांना सेवा देण्यासोबतच झालेल्या नुकसानीलाही भरुन काढण्यासाठी आटापीटा करीत आहे. पण, मर्यादीत प्रवाशी संख्येच्या बेड्या असल्याने ‘आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया’ अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या २० ते २५ बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २२ प्रवाशांनाच विनापास प्रवास करण्याची मुभा असल्याने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, काटोल, मोर्शी, उमरेड, वरुड, राळेगाव आदी ठिकाणी बसप्रवास सुरु आहे. सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्यानुसार बसस्थानकावर बसचे निर्जतुकीकरण करणे, प्रवाशांची नोंद घेणे, बसस्थानकाची स्वच्छता करणे, हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करणे आदी उपाययोजना केल्या जो की नाही, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ च्या स्थानिक प्रतिनिधींनी थेट वर्धा, पुलगाव, हिंगणघाट व आर्वीचे बसस्थानक गाठले. तेव्हा काही ठिकाणी या सुविधांचा अभाव दिसून आला तर काही ठिकाणी सर्व सुविधा असूनही प्रवाशांकडून त्याचा उपयोग घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे.वर्धा स्वच्छता आहे पण,वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या ठिकाणी इतर जिल्ह्यातून येणाºया बसेसचे प्रमाण अधिक आहे. सोबतच येथून लगतच्या अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, उमरखेड, राळेगाव, वरुड, मोर्शी, राजूरा या ठिकाणी जाणाºया बसेसचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचीही संख्या मोठी असते. पण, शासनाने ठरवून दिल्यानुसार बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या आणि बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसचे निर्जतुकीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था दिसली नाही.निर्जंतुकीकरणाचा पत्ता नाहीतसेच बसस्थानकावर हात धुण्यासाठी कुठेही हॅण्डवॉश, सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. मात्र, बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांची वाहकांकडून नोंद घेतली जात होेती. बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना सोशल डिस्टंन्स ठेऊन बसविले जात होते. यावेळी नागपूरातून आलेल्या एका बसचालकाला विचारले असता नागपूरमध्ये बस सॅनिटाईझ झाली पण, वर्ध्यात तशी सुविधा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्धा आगारानेही प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटी