शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गावगाड्याचा लोकवाहिनीतून सुरक्षित प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देअर्थव्यवस्थेला चालना : बसस्थानकावर उपाययोजना, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची घेताहेत नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावगाड्याशी संपर्क साधून अर्थव्यवस्थेला चालना देणाºया लोकवाहिनीचे चाके गेल्या पाच महिन्यानंतर रुळावर यायला सुरुवात झाली आहे. शासनाने आंतरजिल्हा बसप्रवासाला विना ई-पास परिवानगी दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून लालपरी जिल्ह्याबाहेर जाऊन प्रवाशांना सेवा देण्यासोबतच झालेल्या नुकसानीलाही भरुन काढण्यासाठी आटापीटा करीत आहे. पण, मर्यादीत प्रवाशी संख्येच्या बेड्या असल्याने ‘आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया’ अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या २० ते २५ बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २२ प्रवाशांनाच विनापास प्रवास करण्याची मुभा असल्याने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, काटोल, मोर्शी, उमरेड, वरुड, राळेगाव आदी ठिकाणी बसप्रवास सुरु आहे. सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्यानुसार बसस्थानकावर बसचे निर्जतुकीकरण करणे, प्रवाशांची नोंद घेणे, बसस्थानकाची स्वच्छता करणे, हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करणे आदी उपाययोजना केल्या जो की नाही, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ च्या स्थानिक प्रतिनिधींनी थेट वर्धा, पुलगाव, हिंगणघाट व आर्वीचे बसस्थानक गाठले. तेव्हा काही ठिकाणी या सुविधांचा अभाव दिसून आला तर काही ठिकाणी सर्व सुविधा असूनही प्रवाशांकडून त्याचा उपयोग घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे.वर्धा स्वच्छता आहे पण,वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या ठिकाणी इतर जिल्ह्यातून येणाºया बसेसचे प्रमाण अधिक आहे. सोबतच येथून लगतच्या अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, उमरखेड, राळेगाव, वरुड, मोर्शी, राजूरा या ठिकाणी जाणाºया बसेसचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचीही संख्या मोठी असते. पण, शासनाने ठरवून दिल्यानुसार बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या आणि बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसचे निर्जतुकीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था दिसली नाही.निर्जंतुकीकरणाचा पत्ता नाहीतसेच बसस्थानकावर हात धुण्यासाठी कुठेही हॅण्डवॉश, सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. मात्र, बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांची वाहकांकडून नोंद घेतली जात होेती. बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना सोशल डिस्टंन्स ठेऊन बसविले जात होते. यावेळी नागपूरातून आलेल्या एका बसचालकाला विचारले असता नागपूरमध्ये बस सॅनिटाईझ झाली पण, वर्ध्यात तशी सुविधा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्धा आगारानेही प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटी