शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पेट्रोल दरवाढविरोधात रायुकाँ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:08 IST

दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देदेवळी, सेलूत आंदोलन : शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.मागील दहा दिवसांपासून पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढून ८५ रुपयांपेक्षा अधिक तर डिझेलचे दर सात रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे. पेट्रोल व डिझेलची एवढी दरवाढ जनतेने आजपर्यंत कधीही अनुभवली नाही. सर्वसामान्य जनता, शेतकरी यात होरपळून निघत आहे; पण सरकारला त्यांच्याशी काही घेणेदेणे नाही. इंधनाच्या वाढलेल्या प्रचंड किमती कशा कमी करता येतील, यावर चर्चा करण्यापेक्षा सरकार आपल्या खोट्या विकासात मग्न आहे. अवाजवी कर कमी झाल्यास इंधनाच्या किमती निश्चितपणे कमी होतील; पण सरकारला यावर तोडगा काढायला वेळ नाही. संपूर्ण देश या इंधनाच्या आगीत होळपून निघत आहे. याबाबत समीर देशमुख यांनी वाहनचालकांना कमळ फुल देऊन जाणीव करून दिली. वाहन चालकांनीही ‘सब की भूल कमल का फुल’, असे म्हणत मोदी सरकारचा निषेध केला. आम्हा शेतकºयांना दररोज भाजीपाला वर्धा मार्केटला आणावा लागतो. पेट्रोल व डिझेलचे वाढते दर आम्हाला परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी यावेळी दिल्या. पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेलचे दर आमच्या हाती नसल्याने आम्हाला जाणीव आहे; पण पर्याय नसल्याचे सांगितले. यावेळी जि.प. सदस्य संजय कामनापुरे, संदीप पातुरकर, संकेत तळवेकर, मंगेश वानखेडे, सचिन बिरे, योगेश नाखले, आशिष गावंडे, प्रफुल गावंडे, रोशन वानखेडे, राकेश चाफले यांच्यासह रायुकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.सेलू येथे जनसंवाद आंदोलनसेलू - चार वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले आणि आता विकास होईल, अशी अपेक्षा जनता करू लाागली. सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठ्या जाहिरातींच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न मोदी सरकारने दाखवून भरभरुन मते आपल्या झोळीत पाडून घेतली. मोदी लाटेत सर्वच तरले; पण आता चार वर्षे लोटूनही कुठलाच विकास जनतेला दिसत नाही. सर्व क्षेत्रात जनतेची परवड होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सेलू येथील विकास चौकाजवळील पेट्रोल पंपाजवळ रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात जनसंवाद आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक कमळाचे फुल देत चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, महिला, बेरोजगार, विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रीया घेतल्या. यात सर्वत्र नाराजी दिसून आली. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ व शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. सेलू येथील जनसंवाद आंदोलनामध्ये विद्याधर वानखेडे, अर्चित निघडे, श्याम वानखेडे, नरेश खोडके, दिलीप गावंडे, शुभम झाडे, कौशल्य काटे, प्रफुल्ल धानकुटे, समीर धांदे, रामू पवार, साहील पवार, इन्जमाम खतीब, पंकज तलवारे, संकेत निस्ताणे, पिंटू चौधरी, शुभम जगदळे, शुभम पोहाणे, मंगेश नलवडे, अंजिक्य तळवेकर, मयूर जंगठे, दिलीप धोंगडे, चेतन पराते, गोलू तेलरांधे यांच्यासह रायुकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Petrolपेट्रोल