शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेट्रोल दरवाढविरोधात रायुकाँ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:08 IST

दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देदेवळी, सेलूत आंदोलन : शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.मागील दहा दिवसांपासून पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढून ८५ रुपयांपेक्षा अधिक तर डिझेलचे दर सात रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे. पेट्रोल व डिझेलची एवढी दरवाढ जनतेने आजपर्यंत कधीही अनुभवली नाही. सर्वसामान्य जनता, शेतकरी यात होरपळून निघत आहे; पण सरकारला त्यांच्याशी काही घेणेदेणे नाही. इंधनाच्या वाढलेल्या प्रचंड किमती कशा कमी करता येतील, यावर चर्चा करण्यापेक्षा सरकार आपल्या खोट्या विकासात मग्न आहे. अवाजवी कर कमी झाल्यास इंधनाच्या किमती निश्चितपणे कमी होतील; पण सरकारला यावर तोडगा काढायला वेळ नाही. संपूर्ण देश या इंधनाच्या आगीत होळपून निघत आहे. याबाबत समीर देशमुख यांनी वाहनचालकांना कमळ फुल देऊन जाणीव करून दिली. वाहन चालकांनीही ‘सब की भूल कमल का फुल’, असे म्हणत मोदी सरकारचा निषेध केला. आम्हा शेतकºयांना दररोज भाजीपाला वर्धा मार्केटला आणावा लागतो. पेट्रोल व डिझेलचे वाढते दर आम्हाला परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी यावेळी दिल्या. पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेलचे दर आमच्या हाती नसल्याने आम्हाला जाणीव आहे; पण पर्याय नसल्याचे सांगितले. यावेळी जि.प. सदस्य संजय कामनापुरे, संदीप पातुरकर, संकेत तळवेकर, मंगेश वानखेडे, सचिन बिरे, योगेश नाखले, आशिष गावंडे, प्रफुल गावंडे, रोशन वानखेडे, राकेश चाफले यांच्यासह रायुकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.सेलू येथे जनसंवाद आंदोलनसेलू - चार वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले आणि आता विकास होईल, अशी अपेक्षा जनता करू लाागली. सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठ्या जाहिरातींच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न मोदी सरकारने दाखवून भरभरुन मते आपल्या झोळीत पाडून घेतली. मोदी लाटेत सर्वच तरले; पण आता चार वर्षे लोटूनही कुठलाच विकास जनतेला दिसत नाही. सर्व क्षेत्रात जनतेची परवड होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सेलू येथील विकास चौकाजवळील पेट्रोल पंपाजवळ रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात जनसंवाद आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक कमळाचे फुल देत चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, महिला, बेरोजगार, विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रीया घेतल्या. यात सर्वत्र नाराजी दिसून आली. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ व शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. सेलू येथील जनसंवाद आंदोलनामध्ये विद्याधर वानखेडे, अर्चित निघडे, श्याम वानखेडे, नरेश खोडके, दिलीप गावंडे, शुभम झाडे, कौशल्य काटे, प्रफुल्ल धानकुटे, समीर धांदे, रामू पवार, साहील पवार, इन्जमाम खतीब, पंकज तलवारे, संकेत निस्ताणे, पिंटू चौधरी, शुभम जगदळे, शुभम पोहाणे, मंगेश नलवडे, अंजिक्य तळवेकर, मयूर जंगठे, दिलीप धोंगडे, चेतन पराते, गोलू तेलरांधे यांच्यासह रायुकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Petrolपेट्रोल