शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पेट्रोल दरवाढविरोधात रायुकाँ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:08 IST

दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देदेवळी, सेलूत आंदोलन : शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.मागील दहा दिवसांपासून पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढून ८५ रुपयांपेक्षा अधिक तर डिझेलचे दर सात रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे. पेट्रोल व डिझेलची एवढी दरवाढ जनतेने आजपर्यंत कधीही अनुभवली नाही. सर्वसामान्य जनता, शेतकरी यात होरपळून निघत आहे; पण सरकारला त्यांच्याशी काही घेणेदेणे नाही. इंधनाच्या वाढलेल्या प्रचंड किमती कशा कमी करता येतील, यावर चर्चा करण्यापेक्षा सरकार आपल्या खोट्या विकासात मग्न आहे. अवाजवी कर कमी झाल्यास इंधनाच्या किमती निश्चितपणे कमी होतील; पण सरकारला यावर तोडगा काढायला वेळ नाही. संपूर्ण देश या इंधनाच्या आगीत होळपून निघत आहे. याबाबत समीर देशमुख यांनी वाहनचालकांना कमळ फुल देऊन जाणीव करून दिली. वाहन चालकांनीही ‘सब की भूल कमल का फुल’, असे म्हणत मोदी सरकारचा निषेध केला. आम्हा शेतकºयांना दररोज भाजीपाला वर्धा मार्केटला आणावा लागतो. पेट्रोल व डिझेलचे वाढते दर आम्हाला परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी यावेळी दिल्या. पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेलचे दर आमच्या हाती नसल्याने आम्हाला जाणीव आहे; पण पर्याय नसल्याचे सांगितले. यावेळी जि.प. सदस्य संजय कामनापुरे, संदीप पातुरकर, संकेत तळवेकर, मंगेश वानखेडे, सचिन बिरे, योगेश नाखले, आशिष गावंडे, प्रफुल गावंडे, रोशन वानखेडे, राकेश चाफले यांच्यासह रायुकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.सेलू येथे जनसंवाद आंदोलनसेलू - चार वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले आणि आता विकास होईल, अशी अपेक्षा जनता करू लाागली. सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठ्या जाहिरातींच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न मोदी सरकारने दाखवून भरभरुन मते आपल्या झोळीत पाडून घेतली. मोदी लाटेत सर्वच तरले; पण आता चार वर्षे लोटूनही कुठलाच विकास जनतेला दिसत नाही. सर्व क्षेत्रात जनतेची परवड होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सेलू येथील विकास चौकाजवळील पेट्रोल पंपाजवळ रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात जनसंवाद आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक कमळाचे फुल देत चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, महिला, बेरोजगार, विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रीया घेतल्या. यात सर्वत्र नाराजी दिसून आली. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ व शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. सेलू येथील जनसंवाद आंदोलनामध्ये विद्याधर वानखेडे, अर्चित निघडे, श्याम वानखेडे, नरेश खोडके, दिलीप गावंडे, शुभम झाडे, कौशल्य काटे, प्रफुल्ल धानकुटे, समीर धांदे, रामू पवार, साहील पवार, इन्जमाम खतीब, पंकज तलवारे, संकेत निस्ताणे, पिंटू चौधरी, शुभम जगदळे, शुभम पोहाणे, मंगेश नलवडे, अंजिक्य तळवेकर, मयूर जंगठे, दिलीप धोंगडे, चेतन पराते, गोलू तेलरांधे यांच्यासह रायुकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Petrolपेट्रोल