शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘रबर गेट’ पद्धतीने जलाशयाची प्रत्यक्ष उंची वाढविणे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:55 IST

अनेकांना आधार देणाऱ्या धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय १९९९ ला पहिली प्रशासकीय मान्यता मिळूनही विविध कारणास्तव आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. पहिल्या प्रशासकीय मान्यतेची मुदत संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ ला मिळाली. परंतु, प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग; पण अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, प्रत्यक्ष काम तात्काळ सुरू होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनेकांना आधार देणाऱ्या धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय १९९९ ला पहिली प्रशासकीय मान्यता मिळूनही विविध कारणास्तव आजपर्यंत मार्गी लागलेला नाही. पहिल्या प्रशासकीय मान्यतेची मुदत संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ ला मिळाली. परंतु, प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही. ‘रबर गेट’ पद्धतीचा अवलंब धाम प्रकल्पाची १.९० मिटरने उंची वाढविण्याचा हा प्रयोग राज्यातील पहिला ठरणारा असला तरी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच तो सध्या रखडल्याचे दिसून येत आहे.लघु पाटबंधारे विभागाकडे असलेला धाम प्रकल्प वर्धा पाटबंधारे विभागाकडे २०१५ मध्ये वळता करण्यात आला. त्यापुर्वीच या प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी झाल्याने तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला. पहिल्या प्रस्तावाला १९९९ ला प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु, प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्यापूर्वीच सदर प्रशासकीय मान्यतेचा कालावधी संपल्याने दुसरी प्रशासकीय मान्यता २००६ मध्ये घेण्याची वेळ प्रशासनावर आली. मात्र, त्यानंतरही कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी दुर्लक्षच केल्याने तिसºयांदा धाम प्रकल्पाची उंची वाढविण्यासंबंधी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची वेळ वर्धा पाटबंधारे विभागावर आली आहे.सध्या वर्धा शहर व शहराशेजारी असलेल्या ग्रामीण भागातील नागरिंकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातही आचारसंहितेदरम्यान जलसंकटावर मात करण्यासाठी असलेली विविध कामे हाती घेण्यास निवडणूक विभागाची मनाई नसताना सदर विषय मार्गा लावण्यासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या बाजूला सारून केवळ राजकारण हाच त्यांचा एकमेव धंदा आहे काय, असा प्रश्न सध्या वर्ध्यातील सुजान नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांची समस्या आणि धाम प्रकल्पाची उंची वाढल्यानंतर वर्धेकरांना होणारे फायदे लक्षात घेवून जिल्हाधिकाºयांनी या विषयी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही आहे.वनजमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कासवगतीनेचमहाकाळी येथील धाम नदीवर धाम प्रकल्प तयार करताना जी शेतजमीन अधिग्रहित करण्यात आली त्याच शेतजमिनीवर प्रकल्पाची उंची वाढल्यावर पाणी साठविले जाणार आहे. शिवाय प्रकल्पाच्या उंची वाढीनंतर थोड्या प्रमाणात झुडपी वनजमीन पाण्याखाली येणार आहे. असे असले तरी वनजमीन अधिग्रहणाची कार्यवाही सध्या कासवगतीनेच होत असल्याचे सांगण्यात आले.धाम प्रकल्पाच्या उंची वाढीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २९ मार्चला ‘धामची उंची वाढतेय कागदावरच’ या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच आपण तातडीने बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सदर विषयाला अनुसरून संबंधितांकडून आढावा जाणून घेण्यात आला. अंतिम मंजुरी मिळताच उर्वरित प्रक्रिया पार पाडली जाईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.ं

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई