शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

शहरात ‘संचार’ करणाऱ्यांसाठी नाके‘बंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 8:34 PM

जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करीत नागरिकांचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. औषधींसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच इतरही महत्त्वाचे दुकाने आठवड्यातून एक दिवस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीन ठिकाणी रोखले रस्ते : नागरिकांची वाढतेय वर्दळ, वर्ध्यावर कोरोनाचा धोका अद्यापही कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनला आता महिना होत असतानाही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. दोन दिवसांपासून शिथिलतेच्या गैरसमजातून नागरिकांचा संचार वाढला आहे. यात शहरालगतच्या ग्रामपंचायत परिसरातील नागरिकही शहरातच गर्दी करत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता पुन्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात आली. शहरातील तीन ठिकाणी सकाळपासूनच नाकेबंदी करुन रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन कर्तव्य बजावत आहे.जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करीत नागरिकांचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. औषधींसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच इतरही महत्त्वाचे दुकाने आठवड्यातून एक दिवस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेषत: नागरिकांना ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून एका मुख्य भाजीबाजाराची १८ ठिकाणी विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह लगतच्या परिसरातही भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब होतो की नाही, दुकानदारांनी हॅण्ड वॉशची सुविधा केली की नाही आदीवर प्रशासन लक्ष ठेऊन असून वेळप्रसंगी दंडात्मक कारवाईही करीत आहे. औषधी वगळता इतर काही दुकाने दुपारी १ वाजतापर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी असल्याने दुपारपर्यंत नागरिकांची वर्दळ असते. आतापर्यंत दुपारनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची गर्दी वाढायला लागली होती. शहरासोबतच लगतच्या परिसरातील नागरिकही विनाकारण शहरात येऊन गर्दी करायला लागले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्येच रोखून धरले. बुधवारी सकाळपासून बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर बॅरिगेट्स लावून सावंगी व बोरगाव येथून विनाकारण येणाऱ्यांना परत पाठविले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व बॅचलर रोडवरील पावडे चौकातही रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे अनेकांना परतून जावे लागले तसेच काहींनी अंतर्गत रस्त्याचा पर्याय शोधला. या नाकेबंदीमुळे काहींना मनस्ताप झाल्याने त्यांनी रोषही व्यक्त केला. पण, आरोग्याचा धोका टाळण्याकरिता या उपाययोजना आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.धोका गंभीर पण, प्रशासन खंबीरजिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ३५५ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहे. ते आणि जिल्ह्यातील काही व्यक्ती असे मिळून १७ हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील १५ हजार ७६९ व्यक्ती क्वारंटाईन मुक्त झाले तर १ हजार ६५८ व्यक्तीचा अद्याप क्वारंटाईनचा १४ दिवसाचा कालावधी बाकी आहे.आरोग्य विभागाकडून आतापर्यंत १८१ स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविले असून त्यापैकी १७४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यापैकी ७ अहवाल प्रलंबित आहे. महिनाभराच्या कालावधीत एकही रुग्ण आढळून आला नसला तरी इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्याचाही धोका अद्याप संपलेला नाही.नांदेड जिल्हाही वर्ध्याप्रमाणेच निगेटिव्ह होता. पण, आता तेथेही रुग्ण आढळून आल्याने आपल्याही जिल्ह्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर अंमलबजाणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.आतापर्यंत आपण ग्रीन झोनमध्ये असलो तरीही धोका संपलेला नाही. बारेगाव, सावंगी यासह शहरालगतच्या परिसरातही भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची सुविधा असतानाही येथील नागरिक विनाकारण शहरात येऊन गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले. ही गर्दी वाढतच असल्यामुळे आज शहराबाहेरुन येणाºयांसाठी बंदी घालण्यात आली. नागरिकांनी आपापल्या परिसरातूनच वस्तूंची खरेदी करावी. विनाकारण शहरात येऊन गर्दी करु नये.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस