शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

अल्प पावसातच रस्त्यांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:53 IST

पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. ग्रामीण रस्ते व त्यावरील पुलांची त्याहुनही विपरित स्थिती आहे. यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देद्रुतगतीसह राज्यमार्गांवरही खड्डे : पुलांचीही अनेक ठिकाणी क्षती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. ग्रामीण रस्ते व त्यावरील पुलांची त्याहुनही विपरित स्थिती आहे. यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.बांधकाम विभागाकडून रस्त्यांची कामे उन्हाळ्यात पूर्ण करणे गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये केलेली रस्ता दुरूस्ती दीर्घकाळ टिकाव धरू शकत नाही. यामुळे शासनाकडूनही तत्सम दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो; पण यंदा नवीन रस्त्यांची कामे सुरू असल्याने कुठल्याही जुन्या रस्त्यांची डागडुजी, दुरूस्ती वा नुतनीकरण करण्यात आले नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुलगाव ते वर्धा हा दु्रतगती मार्गही पहिल्याच पावसात खड्डेमय झाला आहे. शिवाय बजाज चौकातील खड्डेही उघडे पडलेत.पांदण रस्त्याची लावली पावसाने वाटचिकणी (जा.) - पढेगाव येथून निमगावला जाणाऱ्या पांदण रस्त्याची पहिल्याच पावसाने खस्ताहालत झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न गंभीर झााला आहे. या मार्गावर पढेगाव येथील ३०-४० शेतकºयांची १०० एकरच्या वर शेती आहे.खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी व्यस्त आहेत. कपाशीची लावण करण्यासाठी शेतात शेतीसाहित्याची ने-आण करावी लागत आहे. शेतकरी व शेतमजूरही याच मार्गाने ये-जा करतात. या रस्त्याचे चार वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात आले; पण समोर काहीही झाले नाही. यामुळे संपूर्ण रस्त्यावर माती व चिखल दिसून येतो. ही माती काळी असल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. यंदाही पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चार वर्षांपासून सदर पांदण रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले नाही.सदर रस्त्याचे अंतर अंदाजे ३ किमी असून खडीकरण करण्याकरिता येथील ग्रामपंचायत व शेतकºयांनी संबंधित विभागाला निवेदने दिली होती; पण याची कुणीही दखल घेतली नाही. परिणामी, काही माती असल्याने पावसाळ्यात वहीवाट करताना तारेवरची कसरत करावी लागते. शेतीची मशागत करणे व शेतमजूर शेतापर्यंत नेणेही कठीण होऊन बसले आहे. जमीन सुपिक असल्याने शेतकरी ती पडिक ठेवत नाही; पण खडीकरण न झाल्यास या मार्गावरील शेती पडिकच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत सदर रस्त्याचे खडीकरण करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलीप पुनसे हरिभाऊ पेटकर, रामभाऊ शेंडे, रतन पेटकर, गजानन शेंडे, नामदेव काचोळे, गोपाल दुधाने, मोरेश्वर आंबटकर, भाऊराव कुरसाने, वासुदेव हिवरकर, महादेव रघाटाटे, संजय पहाडे यासह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.पुलाच्या कडा खचल्याचिकणी - चिकणी ते पढेगाव या रस्त्यावर येथून एक किमी अंतरावर नाल्यावर पूल आहे. या नाल्याचे रूंदी, खोली व सरळीकरण करण्यात आले. सदर नाल्याला ४-५ किमीवरून पाणी येत असल्याने त्याची ओढ अधिक असते. पहिल्याच पावसात सदर नाल्याला पूर आल्याने पुलाच्या खालील पाईपमध्ये कचरा साचून पाणी पुलावरून वाहते झाले. यामुळे पुलाच्या कडा खचल्या. संबंधित विभागाने लक्ष देत पाईप मोकळे करणे गरजेचे आहे.