शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसातच रस्त्यांची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:53 IST

पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. ग्रामीण रस्ते व त्यावरील पुलांची त्याहुनही विपरित स्थिती आहे. यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देद्रुतगतीसह राज्यमार्गांवरही खड्डे : पुलांचीही अनेक ठिकाणी क्षती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यातच रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असते. तशी तजवीजही शासनाकडून केली जाते; पण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने पहिल्याच पावसात जिल्ह्यातील रस्त्यांची पोलखोल होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदाही पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. ग्रामीण रस्ते व त्यावरील पुलांची त्याहुनही विपरित स्थिती आहे. यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.बांधकाम विभागाकडून रस्त्यांची कामे उन्हाळ्यात पूर्ण करणे गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये केलेली रस्ता दुरूस्ती दीर्घकाळ टिकाव धरू शकत नाही. यामुळे शासनाकडूनही तत्सम दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो; पण यंदा नवीन रस्त्यांची कामे सुरू असल्याने कुठल्याही जुन्या रस्त्यांची डागडुजी, दुरूस्ती वा नुतनीकरण करण्यात आले नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, पहिला पाऊस पडताच अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुलगाव ते वर्धा हा दु्रतगती मार्गही पहिल्याच पावसात खड्डेमय झाला आहे. शिवाय बजाज चौकातील खड्डेही उघडे पडलेत.पांदण रस्त्याची लावली पावसाने वाटचिकणी (जा.) - पढेगाव येथून निमगावला जाणाऱ्या पांदण रस्त्याची पहिल्याच पावसाने खस्ताहालत झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न गंभीर झााला आहे. या मार्गावर पढेगाव येथील ३०-४० शेतकºयांची १०० एकरच्या वर शेती आहे.खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी व्यस्त आहेत. कपाशीची लावण करण्यासाठी शेतात शेतीसाहित्याची ने-आण करावी लागत आहे. शेतकरी व शेतमजूरही याच मार्गाने ये-जा करतात. या रस्त्याचे चार वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात आले; पण समोर काहीही झाले नाही. यामुळे संपूर्ण रस्त्यावर माती व चिखल दिसून येतो. ही माती काळी असल्याने पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते. यंदाही पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. चार वर्षांपासून सदर पांदण रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले नाही.सदर रस्त्याचे अंतर अंदाजे ३ किमी असून खडीकरण करण्याकरिता येथील ग्रामपंचायत व शेतकºयांनी संबंधित विभागाला निवेदने दिली होती; पण याची कुणीही दखल घेतली नाही. परिणामी, काही माती असल्याने पावसाळ्यात वहीवाट करताना तारेवरची कसरत करावी लागते. शेतीची मशागत करणे व शेतमजूर शेतापर्यंत नेणेही कठीण होऊन बसले आहे. जमीन सुपिक असल्याने शेतकरी ती पडिक ठेवत नाही; पण खडीकरण न झाल्यास या मार्गावरील शेती पडिकच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देत सदर रस्त्याचे खडीकरण करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलीप पुनसे हरिभाऊ पेटकर, रामभाऊ शेंडे, रतन पेटकर, गजानन शेंडे, नामदेव काचोळे, गोपाल दुधाने, मोरेश्वर आंबटकर, भाऊराव कुरसाने, वासुदेव हिवरकर, महादेव रघाटाटे, संजय पहाडे यासह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.पुलाच्या कडा खचल्याचिकणी - चिकणी ते पढेगाव या रस्त्यावर येथून एक किमी अंतरावर नाल्यावर पूल आहे. या नाल्याचे रूंदी, खोली व सरळीकरण करण्यात आले. सदर नाल्याला ४-५ किमीवरून पाणी येत असल्याने त्याची ओढ अधिक असते. पहिल्याच पावसात सदर नाल्याला पूर आल्याने पुलाच्या खालील पाईपमध्ये कचरा साचून पाणी पुलावरून वाहते झाले. यामुळे पुलाच्या कडा खचल्या. संबंधित विभागाने लक्ष देत पाईप मोकळे करणे गरजेचे आहे.