शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

कालव्याच्या पाण्यात हरविला पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या अपूर्ण कामामुळे सोडण्यात आलेले पाणी याच भागातील पांदण रस्त्याने वाहते.

ठळक मुद्देपढेगाव येथील प्रकार : २५ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नादुरूस्त वितरीकांचा परिसरातील शेतकऱ्यांचा चांगलाच फटका सध्या सहन करावा लागत आहे. अशातच नादुरूस्त वितरीकेमुळे कॅनलचे पाणी थेट पांदण रस्त्याने वाहत असल्याने पढेगाव येथील २५ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटंधारे विभागाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या अपूर्ण कामामुळे सोडण्यात आलेले पाणी याच भागातील पांदण रस्त्याने वाहते. शिवाय अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पांदण रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने त्याच भागातील २५ शेतकऱ्यांना हिवाळ्याच्या दिवसात चिखल तुडवतच शेतात जावे लागत आहे. सध्या रबी हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विविध कामे झटपट कशी पूर्ण होईल यावर शेतकरीही लक्ष केंद्रीत करून आहे. परंतु, शेतात जाण्यासाठी असलेल्या मार्गावर कॅनलच्या पाण्यामुळे चिखल तयार झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सध्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणीला गती दिली जात आहे. परंतु, पांढरे सोन अशी ओळख असला कापूस घरी कसा न्यावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या पांदण रस्त्याने साधे पायी जाणेही कठीण असून शेतात बैलगाडी नेण्याची हिम्मतही शेतकºयांची होत नाही. पांदण रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकरी धनराज साटोणे, प्रशांत दुर्गे, किशोर तडस, महादेव भट, गजानन दुर्गे, गंगाधर कानेटकर, राजेंद्र दुर्गे, ज्ञानेश्वर गुजरकर, विठ्ठल गुजरकर, सुरेश शेंडे, रामभाऊ शेंडे, किसना कुडमते, विजय अंतुरकर, गोकुल पचारे, गौरव शेंडे, अनिल चोरे यांच्यासह आदी शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक