शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:28 IST

बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याकरिता जागा शिल्लक राहिली नाही.

ठळक मुद्देव्यावसायिकांची उपासमार : प्रवाशांना अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याकरिता जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बसचालक जागा मिळेल तिथे बस थांबवितो. परिणामी प्रवाशांची मोठी धावपळ व गैरसोय होत आहे. विशेषत: येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सेलू व वर्धा येथे शिक्षणाकरिता प्रवास करतात. त्यामुळे या चौकात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी राहत असल्याने बस पकडण्याच्या धावपळीत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गाच्या कामामुळे लगतच्या व्यावसायिंकाची दुकानेही हटविण्यात आली. आता काम सुरु असल्याने दुकानदारीही थाटता येत नसल्याने त्यांचे व्यवसाय उध्वस्त झाले आहे. रोजगार हिरावल्या गेल्यामुळे ते बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येथे हातगाड्या लावून तसेच आॅटोरिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते. पण, या कामामुळे हातगाड्या लावण्यास जागा राहिली नाही. तसेच आॅटोरिक्षा उभी करण्यासही अडचणीचे ठरत असल्याने साऱ्यांचेच व्यवसाय चौपट झाले आहे. सध्या कच्च्या रस्त्यावरुन नागरिकांची वहिवाट सुरु असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता नवीन बसस्थानक अर्धा किलो मीटर अंतरावर होणार असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे.रस्त्यावरील मांस विक्रीच्या दुकानांमुळे रहदारीस अडथळामोझरी - ग्रामपंचायत लगतच्या मुख्यमार्गावर मांस विक्रीची दुकाने थाटल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पण, याकडे ग्रामपंचात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ही दुकाने इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे. मोझर (शेकापूर) येथे दर रविवारला आठवडी बाजार भरतो. यावेळी अनेक मांसविक्रेते रस्त्यावर दुकान लावून मांस विक्री करतात. गावात जाण्या-येण्याकरीता हाच मुख्य रस्ता आहे. येथूनच गावातील विद्यार्थी, आरोग्य उपकेंद्रात जाणारे नागरिक, रुग्ण ये-जा करतात. त्यामुळे साऱ्यांनाच या दुकानांमुळे अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यांनी याकडे लक्ष घालून ही रस्त्यावरील मांस विक्रीची दुकाने दुसरीक डे स्थलांतरीत करावी. तसेच आढावेढा घेतलेल्या या रस्त्याचे सरळीकीण करुन मार्ग रहदारीस मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी