शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:28 IST

बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याकरिता जागा शिल्लक राहिली नाही.

ठळक मुद्देव्यावसायिकांची उपासमार : प्रवाशांना अपघाताचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याकरिता जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बसचालक जागा मिळेल तिथे बस थांबवितो. परिणामी प्रवाशांची मोठी धावपळ व गैरसोय होत आहे. विशेषत: येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सेलू व वर्धा येथे शिक्षणाकरिता प्रवास करतात. त्यामुळे या चौकात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी राहत असल्याने बस पकडण्याच्या धावपळीत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गाच्या कामामुळे लगतच्या व्यावसायिंकाची दुकानेही हटविण्यात आली. आता काम सुरु असल्याने दुकानदारीही थाटता येत नसल्याने त्यांचे व्यवसाय उध्वस्त झाले आहे. रोजगार हिरावल्या गेल्यामुळे ते बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येथे हातगाड्या लावून तसेच आॅटोरिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते. पण, या कामामुळे हातगाड्या लावण्यास जागा राहिली नाही. तसेच आॅटोरिक्षा उभी करण्यासही अडचणीचे ठरत असल्याने साऱ्यांचेच व्यवसाय चौपट झाले आहे. सध्या कच्च्या रस्त्यावरुन नागरिकांची वहिवाट सुरु असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता नवीन बसस्थानक अर्धा किलो मीटर अंतरावर होणार असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे.रस्त्यावरील मांस विक्रीच्या दुकानांमुळे रहदारीस अडथळामोझरी - ग्रामपंचायत लगतच्या मुख्यमार्गावर मांस विक्रीची दुकाने थाटल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पण, याकडे ग्रामपंचात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ही दुकाने इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे. मोझर (शेकापूर) येथे दर रविवारला आठवडी बाजार भरतो. यावेळी अनेक मांसविक्रेते रस्त्यावर दुकान लावून मांस विक्री करतात. गावात जाण्या-येण्याकरीता हाच मुख्य रस्ता आहे. येथूनच गावातील विद्यार्थी, आरोग्य उपकेंद्रात जाणारे नागरिक, रुग्ण ये-जा करतात. त्यामुळे साऱ्यांनाच या दुकानांमुळे अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यांनी याकडे लक्ष घालून ही रस्त्यावरील मांस विक्रीची दुकाने दुसरीक डे स्थलांतरीत करावी. तसेच आढावेढा घेतलेल्या या रस्त्याचे सरळीकीण करुन मार्ग रहदारीस मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी