सीबीएसई बारावी जिल्ह्यात रितेश अव्वल
By Admin | Updated: May 27, 2014 01:02 IST2014-05-27T01:02:18+5:302014-05-27T01:02:18+5:30
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यात जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे व भवन्स विद्या निकेतन या

सीबीएसई बारावी जिल्ह्यात रितेश अव्वल
मुलीतून अंकीता व कस्तुरी संयुक्तरित्या प्रथम
वर्धा : केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यात जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे व भवन्स विद्या निकेतन या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. भवन्सच्या विज्ञान शाखेतील संगणक विभागाचा विद्यार्थी रितेश निमजे याने ९६.४ टक्के गुणांसह जिल्ह्यातून प्रथम स्थान पटकाविले आहे. तर मुलींमधून संयुक्तरित्या जवाहर नवोदयच्या कस्तुरी वर्मा व भवन्सच्या वाणिज्य शाखेतील अंकीता सतीजा यांनी ९५.६ टक्के गुण मिळवत मुलींमधून प्रथम आल्या. जवाहर नवोदय विद्यालयातून बारावीत ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. याहीवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेनी १०० टक्के निकाल दिला. शाळेतून कस्तुरी वर्मा प्रथम आली आहे. तसेच ९४.४ टक्के गुणांसह, वैभव गावंडे द्वितीय तर आभास झा याने ९३.४ टक्के तृतीय आला. भुगाव येथील भवन्स लॉयडस् विद्यानिकेतननेही १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेतुन रितेश निमजे याने शाळेतून प्रथम स्थान मिळविले. तसेच स्वप्नील शर्मा याने ९४.४ टक्के गुण घेत द्वितीय स्थान तर प्रखर माहेश्वरी याने ९३ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळविले आहे. या शाळेचा विज्ञान शाखेतून ६४ टक्के विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. वाणिज्य शाखेतील ६७ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी सह परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वाणिज्य शाखेत मुलींनी बाजी मारत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळविले आहे. यात अंकीता सतीजा ही वाणिज्य शाखेतून प्रथम तसेच द्वितीय क्रमांकावरील अनुक्षा खोडे हिने ९१ टक्के गुण मिळविले आहे. हर्षदा जाचक ८६.४ टक्के गुणांसह तृतीय स्थानावर राहिली.(प्रतिनिधी)