शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

फेरफार पंजीसाठी शेतकऱ्यांची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:05 IST

अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे.

ठळक मुद्देतालुका कचेरीतील प्रकार : पीक कर्ज कागदपत्रांचा खर्च हजाराच्या घरात

प्रफुल्ल महंतारे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दहा पंधरा फेरफार पंजीसाठी अर्ज दिलेले शेतकरी आपले काम झाले असेल या आशेने येथे येतात; पण सध्या त्यांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अभिलेख विभागाच्या दारावर गर्दी करून तास-तास उभे राहत स्वत:चा अर्ज शोधावा लागतो. मोठी माथापच्छी करून अर्ज मिळाल्यावर तो संबंधीत कर्मचाºयांकडे दिल्यानंतर काम होईलच असे नाही. तर त्यासाठी संंबंधीतांशी वेगळे सोपस्कार पार पाडावे लागत आहेत. या कामासाठी शेतकऱ्यांना सध्यात चार-चार तास तहसील कार्यालयातच थांबावे लागत आहे. अर्ज संबंधितांना दिल्यानंतर दोन तासांनी काम पूर्णत्त्वास जात असल्याची हमी मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीत शिरून तासभर धक्के सहन केल्यानंतर फेरफार पंजीची नक्कल हाती पडते. मात्र, ज्यांना अशाप्रकारे गर्दीत शिरणे शक्य नसते त्या महिलांसह वयोवृद्धांना सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत रहावे लागत आहे. अशांच्या नावाचा साधा पुकाराही कुणी घेत नाही. अशामच कार्यालय बंद होण्याची घटीका समिप येत असून अनेकांना आल्या पावली परतावे लागत आहे. एकूणच पीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी शेतकरी झुंजच द्यावी लागत असल्याचे चित्र सध्या समुद्रपूर तहसील कार्यालयात बघावयास मिळत आहे. ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ अशा घोषणा भाजपा सरकार करीत असले तरी बँकांद्वारे विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी एका शेतकºयाला सध्या सुमारे एक हजार रुपये खर्च येत असून अनेकांना हा खर्च सोसनेही शक्य होत नाही. विशेष म्हणजे, हैसीयत प्रमाणपत्र १०० रूपये, तलाठी कागदपत्रे ५० रूपये, फेरफार पंजी फी ५० रूपये, पंजीची नक्कल शोधून देण्यासाठी अनधिकृत पणे २०० रुपये या शिवाय तालुक्याच्या एका टोकावर असणाऱ्यांना कागदपत्रांसाठी चार चकरा मारणाऱ्या लागत असल्याने प्रवास खर्च ५०० रुपये असा मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या अनेक शेतकºयांवर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले असून फरीदपूर येथील शेतकरी गोविंदा गजभे, मंगरूळचे शेतकरी हुसुकले, शिवनीचे खिळेकर यांना अर्ज करूनही फेरफार पंजी मिळालेली नाही. या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.अर्ज दाखल करणे जिकरीचेचसदर कार्यालयात अर्ज दाखल करणेही त्रासदायक ठरत आहे. काही जण केवळ अर्ज देण्यासाठी आले असतात नागरिकांच्या गर्दीमुळे त्यांना देखील बराच वेळ ताटकळत राहावे लागते. गर्दीत टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या पुढे गेल्याशिवाय अर्ज घेतला जात नाही.मोठ्या परिश्रमानंतर ज्यांचे काम होते. त्यांच्या चेहºयावर यशस्वीपणे खिंड लढविल्याचा आनंदच बघाला मिळतो हे विशेष.फेरफार पंजी नक्कलीसाठीचे ३५० अर्ज पेंडींग आहेत. त्यापैकी १७५ अर्ज निकाली काढलेले आहेत. पीक कर्ज मेळाव्यात काही कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कार्यालयीन काम प्रभावीत होत आहे. आवेदन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वेळीच मिळतील.- महेंद्र सूर्यवंशी,नायब तहसीलदार,समुद्रपूर.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती