शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

फेरफार पंजीसाठी शेतकऱ्यांची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:05 IST

अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे.

ठळक मुद्देतालुका कचेरीतील प्रकार : पीक कर्ज कागदपत्रांचा खर्च हजाराच्या घरात

प्रफुल्ल महंतारे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दहा पंधरा फेरफार पंजीसाठी अर्ज दिलेले शेतकरी आपले काम झाले असेल या आशेने येथे येतात; पण सध्या त्यांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अभिलेख विभागाच्या दारावर गर्दी करून तास-तास उभे राहत स्वत:चा अर्ज शोधावा लागतो. मोठी माथापच्छी करून अर्ज मिळाल्यावर तो संबंधीत कर्मचाºयांकडे दिल्यानंतर काम होईलच असे नाही. तर त्यासाठी संंबंधीतांशी वेगळे सोपस्कार पार पाडावे लागत आहेत. या कामासाठी शेतकऱ्यांना सध्यात चार-चार तास तहसील कार्यालयातच थांबावे लागत आहे. अर्ज संबंधितांना दिल्यानंतर दोन तासांनी काम पूर्णत्त्वास जात असल्याची हमी मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीत शिरून तासभर धक्के सहन केल्यानंतर फेरफार पंजीची नक्कल हाती पडते. मात्र, ज्यांना अशाप्रकारे गर्दीत शिरणे शक्य नसते त्या महिलांसह वयोवृद्धांना सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत रहावे लागत आहे. अशांच्या नावाचा साधा पुकाराही कुणी घेत नाही. अशामच कार्यालय बंद होण्याची घटीका समिप येत असून अनेकांना आल्या पावली परतावे लागत आहे. एकूणच पीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी शेतकरी झुंजच द्यावी लागत असल्याचे चित्र सध्या समुद्रपूर तहसील कार्यालयात बघावयास मिळत आहे. ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ अशा घोषणा भाजपा सरकार करीत असले तरी बँकांद्वारे विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी एका शेतकºयाला सध्या सुमारे एक हजार रुपये खर्च येत असून अनेकांना हा खर्च सोसनेही शक्य होत नाही. विशेष म्हणजे, हैसीयत प्रमाणपत्र १०० रूपये, तलाठी कागदपत्रे ५० रूपये, फेरफार पंजी फी ५० रूपये, पंजीची नक्कल शोधून देण्यासाठी अनधिकृत पणे २०० रुपये या शिवाय तालुक्याच्या एका टोकावर असणाऱ्यांना कागदपत्रांसाठी चार चकरा मारणाऱ्या लागत असल्याने प्रवास खर्च ५०० रुपये असा मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या अनेक शेतकºयांवर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले असून फरीदपूर येथील शेतकरी गोविंदा गजभे, मंगरूळचे शेतकरी हुसुकले, शिवनीचे खिळेकर यांना अर्ज करूनही फेरफार पंजी मिळालेली नाही. या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.अर्ज दाखल करणे जिकरीचेचसदर कार्यालयात अर्ज दाखल करणेही त्रासदायक ठरत आहे. काही जण केवळ अर्ज देण्यासाठी आले असतात नागरिकांच्या गर्दीमुळे त्यांना देखील बराच वेळ ताटकळत राहावे लागते. गर्दीत टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या पुढे गेल्याशिवाय अर्ज घेतला जात नाही.मोठ्या परिश्रमानंतर ज्यांचे काम होते. त्यांच्या चेहºयावर यशस्वीपणे खिंड लढविल्याचा आनंदच बघाला मिळतो हे विशेष.फेरफार पंजी नक्कलीसाठीचे ३५० अर्ज पेंडींग आहेत. त्यापैकी १७५ अर्ज निकाली काढलेले आहेत. पीक कर्ज मेळाव्यात काही कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कार्यालयीन काम प्रभावीत होत आहे. आवेदन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वेळीच मिळतील.- महेंद्र सूर्यवंशी,नायब तहसीलदार,समुद्रपूर.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती