शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

फेरफार पंजीसाठी शेतकऱ्यांची झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:05 IST

अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे.

ठळक मुद्देतालुका कचेरीतील प्रकार : पीक कर्ज कागदपत्रांचा खर्च हजाराच्या घरात

प्रफुल्ल महंतारे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच शेतकऱ्याला समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातही फेरफार पंजी मिळविण्यासाठी अक्षरश: अधिकाऱ्यांशी झुंडच द्यावी लागत आहे. परिणामी, वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दहा पंधरा फेरफार पंजीसाठी अर्ज दिलेले शेतकरी आपले काम झाले असेल या आशेने येथे येतात; पण सध्या त्यांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अभिलेख विभागाच्या दारावर गर्दी करून तास-तास उभे राहत स्वत:चा अर्ज शोधावा लागतो. मोठी माथापच्छी करून अर्ज मिळाल्यावर तो संबंधीत कर्मचाºयांकडे दिल्यानंतर काम होईलच असे नाही. तर त्यासाठी संंबंधीतांशी वेगळे सोपस्कार पार पाडावे लागत आहेत. या कामासाठी शेतकऱ्यांना सध्यात चार-चार तास तहसील कार्यालयातच थांबावे लागत आहे. अर्ज संबंधितांना दिल्यानंतर दोन तासांनी काम पूर्णत्त्वास जात असल्याची हमी मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीत शिरून तासभर धक्के सहन केल्यानंतर फेरफार पंजीची नक्कल हाती पडते. मात्र, ज्यांना अशाप्रकारे गर्दीत शिरणे शक्य नसते त्या महिलांसह वयोवृद्धांना सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत रहावे लागत आहे. अशांच्या नावाचा साधा पुकाराही कुणी घेत नाही. अशामच कार्यालय बंद होण्याची घटीका समिप येत असून अनेकांना आल्या पावली परतावे लागत आहे. एकूणच पीक कर्जाच्या कागदपत्रांसाठी शेतकरी झुंजच द्यावी लागत असल्याचे चित्र सध्या समुद्रपूर तहसील कार्यालयात बघावयास मिळत आहे. ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ अशा घोषणा भाजपा सरकार करीत असले तरी बँकांद्वारे विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी एका शेतकºयाला सध्या सुमारे एक हजार रुपये खर्च येत असून अनेकांना हा खर्च सोसनेही शक्य होत नाही. विशेष म्हणजे, हैसीयत प्रमाणपत्र १०० रूपये, तलाठी कागदपत्रे ५० रूपये, फेरफार पंजी फी ५० रूपये, पंजीची नक्कल शोधून देण्यासाठी अनधिकृत पणे २०० रुपये या शिवाय तालुक्याच्या एका टोकावर असणाऱ्यांना कागदपत्रांसाठी चार चकरा मारणाऱ्या लागत असल्याने प्रवास खर्च ५०० रुपये असा मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या अनेक शेतकºयांवर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले असून फरीदपूर येथील शेतकरी गोविंदा गजभे, मंगरूळचे शेतकरी हुसुकले, शिवनीचे खिळेकर यांना अर्ज करूनही फेरफार पंजी मिळालेली नाही. या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.अर्ज दाखल करणे जिकरीचेचसदर कार्यालयात अर्ज दाखल करणेही त्रासदायक ठरत आहे. काही जण केवळ अर्ज देण्यासाठी आले असतात नागरिकांच्या गर्दीमुळे त्यांना देखील बराच वेळ ताटकळत राहावे लागते. गर्दीत टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या पुढे गेल्याशिवाय अर्ज घेतला जात नाही.मोठ्या परिश्रमानंतर ज्यांचे काम होते. त्यांच्या चेहºयावर यशस्वीपणे खिंड लढविल्याचा आनंदच बघाला मिळतो हे विशेष.फेरफार पंजी नक्कलीसाठीचे ३५० अर्ज पेंडींग आहेत. त्यापैकी १७५ अर्ज निकाली काढलेले आहेत. पीक कर्ज मेळाव्यात काही कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कार्यालयीन काम प्रभावीत होत आहे. आवेदन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे वेळीच मिळतील.- महेंद्र सूर्यवंशी,नायब तहसीलदार,समुद्रपूर.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती