शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जविषयक समस्यांची सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:51 IST

आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देआमदार केळझर बँक शाखेला भेट : चार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालतो कारभार

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शाखा व्यवस्थापक पवन राईकवार यांच्या आमदारांना बँकेतील कामकाजाबाबत माहिती दिली.सध्या पावसाळी हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. केळझर येथील बँकेत दहा गावाचे जवळपास ११ हजार खातेधारक आहे. येथे ४२३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून टप्प्याटप्प्याने त्याची यादी येत असल्याने यादीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती दिली जात आहे. पुढील यादीत आणखी आणखी २०० शेतकऱ्यांचे नावे येतील अशी माहिती शाखा व्यवस्थापक राईकवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिली. शेतकऱ्यांवरील कर्ज हे शासनाकडून माफ होत असून आम्हाला फक्त व्याज माफ करण्याचेच अधिकार आहेत. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबी समजून घेतल्या तर काम अधिक सोईस्कर ठरेल. असे यावेळी आमदारांना बँक प्रशासनाने सांगितले. या शाखेत शाखा व्यवस्थापक, उप शाखा व्यवस्थापक यांच्यासह संगणक चालक व रोखपाल असे चार कर्मचारी आहेत. यांच्या सहायाने कर्जाची सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी शेतकरी आशिष ईरुटकर, विलास नगराळे, वडगांव जंगली ,बाबाराव नरड, वासुदेव नखाते यांच्याशी आमदार डॉ. भोयर यांनी चर्चा केली. व कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास सेलू तहसील कार्यालयात संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आमदार पंकज भोयर सोबत सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने व विजय खोडे, विलास वरटकर, अशोक कलोडे, चंद्रशेखर वंजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी अजूनही जिल्ह्यात १३ ते १४ हजार शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाही. त्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे आता पीक कर्ज घेतांना त्यांना बँकेत त्रास सहन करावा लागत आहे. बँकेकडे मनुष्य बळाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना बरेचवेळा परत जावे लागत आहे.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रPankaj Bhoyarपंकज भोयर